• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, July 18, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात पावसाची दडी, ५ लाख हेक्टरवरील पिके धोक्यात; बळीराजा हवालदिल

admin by admin
July 17, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात पावसाची दडी, ५ लाख हेक्टरवरील पिके धोक्यात; बळीराजा हवालदिल
0
SHARES
183
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. जवळपास महिनाभराच्या प्रदीर्घ विश्रांतीमुळे जिल्ह्यातील सुमारे ५ लाख हेक्टरवरील खरिपाची कोवळी पिके धोक्यात आली आहेत. पाण्याअभावी पिके माना टाकत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, त्याच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

यंदा मे महिन्यात जिल्ह्यात तब्बल २९८ मिमी विक्रमी पाऊस झाला होता. या दमदार पूर्वमोसमी पावसाच्या जोरावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने ५.११ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरिपाची पेरणी केली होती. यामध्ये सर्वाधिक ४.१६ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा आहे. मात्र, पेरणीनंतर म्हणजेच गेल्या दीड महिन्यात जिल्ह्यात केवळ १३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या महिनाभरापासून केवळ कोरडे आभाळ आणि सोसाट्याचे वारे वाहत आहेत. त्यातच भर म्हणून गेल्या चार दिवसांपासून कडक ऊन पडत असल्याने जमिनीतील ओलावा नाहीसा झाला आहे. यामुळे उगवलेली कोवळी पिके कोमेजू लागली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, ते तुषार, ठिबक आणि अन्य साधनांनी पाणी देऊन पिके जगवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, बहुतांश जिरायती शेती पावसावरच अवलंबून असल्याने पिकांची अवस्था दिवसेंदिवस नाजूक होत चालली आहे. जर पुढील काही दिवसांत पावसाने हजेरी लावली नाही, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Previous Post

तुळजाभवानी मंदिरात अधिकाऱ्यांना मोफत दर्शन, सामान्य भाविक त्रस्त; संस्थानाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात पावसाची दडी, ५ लाख हेक्टरवरील पिके धोक्यात; बळीराजा हवालदिल

धाराशिव जिल्ह्यात पावसाची दडी, ५ लाख हेक्टरवरील पिके धोक्यात; बळीराजा हवालदिल

July 17, 2025
तुळजाभवानी मंदिराचा कायापालट होणार, दोन हजार कोटींचा आराखडा सादर

तुळजाभवानी मंदिरात अधिकाऱ्यांना मोफत दर्शन, सामान्य भाविक त्रस्त; संस्थानाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

July 17, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

उमरग्यात दिवसाढवळ्या कारची काच फोडून ५२ हजारांची रोकड लंपास

July 17, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

“आमच्या जनावरांची गाडी का पकडतोस?” विचारत तरुणाला दगडाने आणि काठीने मारहाण

July 17, 2025
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

कळंब तालुक्यात तरुणाची आत्महत्या; लग्नासाठी तगादा लावणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल

July 17, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group