• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, October 13, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शेतकरी सरकारचे ATM नाहीत…

आमदार कैलास पाटील यांचा सरकारवर घणाघात

admin by admin
October 1, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के
0
SHARES
184
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: “शेतकरी सरकारचे एटीएम नाहीत की हवे तेव्हा कपात केली आणि राजकारण करून मदत दाखवली,” अशा तिखट शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आमदार कैलास पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाच्या प्रत्येक टनामागे १५ रुपये कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयावर त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून संताप व्यक्त केला आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

आमदार पाटील यांनी सरकारच्या या धोरणाला ‘शेतकऱ्यांची लूट आणि आधुनिक टोलवसुली’ असे संबोधले आहे. “पूरग्रस्तांना मदत द्यायची असेल, तर सरकारने स्वतःचा खजिना उघडला पाहिजे. मात्र, इथे शेतकऱ्यांकडूनच जबरदस्तीने पैसे वसूल करून मदत निधी उभा करण्याचा प्रयत्न म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

सरकारच्या खर्चावर ठेवले बोट

कैलास पाटील यांनी सरकारच्या इतर खर्चांवरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “मुख्यमंत्री महोदय, तुम्ही निनावी जाहिरातींसाठी कोट्यवधींचा चुराडा करता, बेडसाठी लाखो रुपये खर्चता आणि कोणाचीही मागणी नसलेला २० हजार कोटींचा शक्तिपीठ महामार्ग पुढे रेटता, पण पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही का?” दिल्ली दरबारी जाऊन हजारो कोटींचा निधी आणण्याची हिंमत सरकारमध्ये नाही का, असा थेट सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

“शक्तिपीठ महामार्ग रद्द करून निधी पूरग्रस्तांना द्या”

आमदार पाटील यांनी वादग्रस्त शक्तिपीठ महामार्ग रद्द करून त्याचा निधी पूरग्रस्त आणि गरजू शेतकऱ्यांसाठी वळवण्याची मागणी केली आहे. “आज शेतकऱ्यांचे डोळे भरले आहेत आणि खिसा रिकामा झाला आहे. अशा परिस्थितीत त्याच शेतकऱ्याचा घाम पिळून त्यालाच आधार देण्याचे ढोंग सरकार करत आहे. शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लावून केलेली मदत ही मदत नसून अन्याय आहे,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

सरकारने हा शेतकरीविरोधी निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी मागणी करत त्यांनी या निर्णयाचा जाहीर निषेध केला. त्यांच्या या फेसबुक पोस्टला खासदार ओमराजे निंबाळकर यांनाही टॅग करण्यात आले आहे. या पोस्टमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Previous Post

पीक गेलं, जीवही गेला! अणदूर येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Next Post

उमरग्यात गांजा सेवन करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

उमरग्यात गांजा सेवन करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मोठी कारवाई: ‘पिंजरा’ लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द; नियमभंगाचा ठपका

पिंजरा बंद झाला, आता महाकालीवर वरवंटा कधी फिरणार?

October 12, 2025
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

आंबी पोलिसांची कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

October 11, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

करजखेडा चौकातील सराफा दुकान फोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिव: जिल्हा परिषदेत बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक; गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

उमरगा: शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांकडून मारहाण; जीवे मारण्याची धमकी

October 11, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group