• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 26, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नवरात्र जनजागर यात्रेला सुरुवात

ऊस, सोयाबीनच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांनी एकत्र यावे - जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे

admin by admin
October 17, 2023
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नवरात्र जनजागर यात्रेला सुरुवात
0
SHARES
129
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल 4 हजार रुपये, सोयाबीनला 7 हजार रुपये हमीभाव मिळावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली नवरात्र जनजागर यात्रेला सुरुवात झाली आहे. सदर मागण्यांबाबत त्यांनी तुळजापूर तालुक्यातील शहापूर, गुजनूर, निलेगाव, खुदावाडी, दहिटणे, गुळहळ्ळी व परिसरातील गावात शेतकऱ्यांशी संवाद साधून जनजागृती केली.

जनजागर यात्रेत बोलताना जिल्हाध्यक्ष इंगळे म्हणाले की, यावर्षी ऊसाला किमान साडेतीन ते चार हजार प्रतिटन भाव मिळाला पाहिजे. त्याचबरोबर सोयाबीन काढणी खर्च व इतर खर्च मिळून उत्पादनाच्या दुप्पट खर्च होत आहे. त्यामुळे सोयाबीनला प्रतिक्विंटल जास्तीत जास्त भाव मिळाला पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. त्याचबरोबर शहापूर येथील शेतकरी नागनाथ सावकार, दिनेश जगताप, दत्ता व्हंताळे यांनी जोपर्यंत कारखाने एफआरपी जाहीर करत नाहीत तोपर्यंत ऊस देणार नाही असे नमूद केले.

त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या बाबतीतील सर्व व्यथा मांडल्या. यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर जिल्हाध्यक्ष इंगळे म्हणाले की, सोयाबीन लागवडीपासून काढणीपर्यंतचा खर्च व शेतकऱ्याना सध्या मिळत असलेला भाव यात मोठी तफावत आहे. असेच चालू राहिले तर आत्महत्यांचे प्रमाण वाढत जाईल आणि शेतकरी कधीच फायद्यात राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र आले पाहिजे व शासन दरबारी शेतकऱ्यांच्या व्यथा या मांडल्या पाहिजे अशी इंगळे यांनी नमूद केले. तसेच येणाऱ्या काळात नवरात्रीनंतर ऊस उत्पादक शेतकरी व सोयाबीन उत्पादक शेतकरी यांच्या विविध प्रश्नांसाठी तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी जनजागर यात्रेत हक्काचा पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला पाहिजे. अशी मागणीही जोर धरत आहे. इंगळे यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या भावना या सरकार दरबारी पोहोचणार याची ग्वाही देऊन ऊस व सोयाबीनला जास्तीत जास्त भाव कसा मिळेल याबाबत जिल्हाभरात जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर लवटे, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष मकबूल मुल्ला, प्रगतशील शेतकरी भास्कर सुरवसे, नागनाथ सुरवसे, विभागीय अध्यक्ष युवराज नवाडे, शहापूर येथील शेतकरी नेते मधुकर लवटे, सुखदेव गोरे, राजेंद्र सुरवसे, गणेश जगताप नसीर पटेल, प्रकाश शिंदे, लक्ष्मण व्हंताळे, परमेश्वर व्हंताळे, शिवाजी जगताप इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

Previous Post

नळदुर्गमध्ये तलवार बाळगणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

Next Post

तुळजापुरात अन्न व औषध प्रशासन मिशन मोडवर

Next Post
तुळजापुरात अन्न व औषध प्रशासन मिशन मोडवर

तुळजापुरात अन्न व औषध प्रशासन मिशन मोडवर

ताज्या बातम्या

धाराशिव शहराच्या दुरवस्थेवरून काँग्रेस आक्रमक; नगर परिषदेवर हल्लाबोल

धाराशिव शहराच्या दुरवस्थेवरून काँग्रेस आक्रमक; नगर परिषदेवर हल्लाबोल

August 26, 2025
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट शपथपत्र तयार करून प्लॉट हडपण्याचा प्रयत्न; तुळजापुरात दोघा भावांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

August 26, 2025
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

कळंब तालुक्यातील वडगाव येथे किरकोळ कारणावरून गटबाजी; चौघांना मारहाण, आठ जणांवर गुन्हा दाखल

August 26, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरे, शेत आणि कंपन्या लक्ष्य, एकाच दिवसात १४ लाखांवर डल्ला

August 26, 2025
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

येडशी टोलनाक्याजवळ २० हजारांचा गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 26, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group