• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, October 13, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

काळी आईच वाहून गेली, आता पेरायचं काय?

धाराशिवच्या शेतकऱ्याची अश्रूंची गाथा..

admin by admin
September 30, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
काळी आईच वाहून गेली, आता पेरायचं काय?
0
SHARES
19
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मराठवाड्याच्या कोरडवाहू कपाळावर नियतीने पुन्हा एकदा क्रूरतेचा नांगर फिरवला आहे. धाराशिव, तोच जिल्हा जो देशातील सर्वात मागासलेल्यांच्या यादीत मानाने (!) तिसरा क्रमांक पटकावतो, आज निसर्गाच्या रौद्र रूपात अक्षरशः वाहून गेला आहे. ‘सांगा हा शेतकरी कसा उभा राहील?’ हा प्रश्न आज केवळ एका जिल्ह्याचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या माणुसकीला विचारलेला सवाल आहे.

या जिल्ह्याने काय सोसले नाही? १९७२ चा दुष्काळ पाहिला, जिथे घोटभर पाण्यासाठी माणसे वणवण फिरली आणि गावंच्या गावं ओस पडली. त्यानंतर १९९३ साली भूकंपाने धरती हादरली, सास्तूर – माकणीच्या किंकाळ्यांनी आसमंत फाटला, हजारो जीव गेले, संसार मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. पण धाराशिवचा शेतकरी फिनिक्स पक्षाप्रमाणे त्याही राखेतून उभा राहिला. जखमा भरल्या, घरं उभी राहिली आणि मोडलेला कणा पुन्हा ताठ झाला.

पण यंदाचा घाव वर्मी बसला आहे. हा ना दुष्काळ आहे, ना भूकंप. ही तर जलप्रलयाची आपत्ती आहे. ज्या पावसासाठी इथला शेतकरी डोळे आकाशाकडे लावून बसतो, त्याच पावसाने आज त्याचे घर, शेत, जनावरं आणि स्वप्नं सगळं काही गिळंकृत केलं आहे. भूम, परंडा, कळंब तालुक्यांत तर आभाळच फाटलं. धरणं, तलाव ओसंडून वाहत आहेत, जणू काही निसर्गानेच शेतकऱ्याच्या विरोधात अघोषित युद्ध पुकारले आहे.

हे नुकसान केवळ पिकांचे नाही. पिकांसोबत शेतच वाहून गेले आहे. काळी आई, जिच्या जीवावर पिढ्यानपिढ्या पोसल्या गेल्या, तीच माती डोळ्यादेखत ओघळून गेली. शेतात मोठमोठे खड्डे पडले आहेत, जणू काही भूगोलच बदलून गेला आहे. पूल, रस्ते वाहून गेले, संपर्क तुटला आणि माणूस बेटावर अडकल्यासारखा हतबल झाला आहे. हेलिकॉप्टरने जीव वाचवले, पण जगण्याचं काय? जनावरं मेली, घरं पडली, आणि उरलाय तो फक्त डोळ्यांतला पूर आणि काळजातला आक्रोश.

नेत्यांचे दौरे झाले, कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकले, आश्वासनांची पेरणी झाली. उपमुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत सर्वांनी ‘पर्यटन’ पूर्ण केले. पण आता शब्दांची नाही, तर ठोस मदतीची गरज आहे. ही वेळ केवळ पंचनाम्यांची आणि कोरड्या सहानुभूतीची नाही.

सरकारने आता कोणताही मुलाहिजा न ठेवता ‘ओला दुष्काळ’ जाहीर करायला हवा. शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं तात्काळ उतरवलं पाहिजे. तुटपुंजी नव्हे, तर हेक्टरी किमान २० हजार रुपयांची थेट मदत त्याच्या खात्यात जमा झाली पाहिजे. आणि पीक विम्याच्या नावाखाली सुरू असलेली टोलवाटोलवी थांबवून, त्याला त्याच्या हक्काचा विमा मिळायलाच हवा.

धाराशिवचा शेतकरी आजवर अनेक संकटांशी लढला आणि जिंकला. पण यावेळची लढाई एकट्याची नाही. त्याच्या पाठीवर मायेचा हात आणि खात्यात मदतीचा आकडा दिसला, तरच तो पुन्हा उभा राहील. नाहीतर, मराठवाड्याच्या या काळ्या मातीत, शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त स्वप्नांची एक नवी, काळी कहाणी लिहिली जाईल, जी पुसायला कदाचित अनेक दशकं लागतील. सरकारने आता ठरवायचे आहे: या कहाणीचे लेखक व्हायचे की उद्धारकर्ते?

  • सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह 
Previous Post

तुळजापूर नवरात्रोत्सव: भाविकांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ प्रमुख मार्ग ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान बंद

Next Post

धाराशिव थार अपघात प्रकरण: मद्यधुंद चालकावर गुन्हा दाखल

Next Post
धाराशिवमध्ये मद्यधुंद थार चालकाचा थरार; चौघांना चिरडले

धाराशिव थार अपघात प्रकरण: मद्यधुंद चालकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मोठी कारवाई: ‘पिंजरा’ लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द; नियमभंगाचा ठपका

पिंजरा बंद झाला, आता महाकालीवर वरवंटा कधी फिरणार?

October 12, 2025
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

आंबी पोलिसांची कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

October 11, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

करजखेडा चौकातील सराफा दुकान फोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिव: जिल्हा परिषदेत बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक; गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

उमरगा: शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांकडून मारहाण; जीवे मारण्याची धमकी

October 11, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group