• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, October 13, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवच्या रस्त्यांवरून राजकारण तापले: “उद्घाटनाला पंतप्रधान आले तरी चालतील, पण आधी खड्डे बुजवा!”

सोमनाथ गुरव यांचा आमदार राणा पाटलांवर हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांच्या वर्चस्ववादात जनता भरडली जात असल्याचा आरोप

admin by admin
August 9, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिवच्या रस्त्यांवरून राजकारण तापले: “उद्घाटनाला पंतप्रधान आले तरी चालतील, पण आधी खड्डे बुजवा!”
0
SHARES
409
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : “तुम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय, थेट देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते रस्त्यांचे उद्घाटन करा, पण कृपा करून धाराशिवच्या नागरिकांना या खड्ड्यांच्या नरकयातनेतून एकदाचे मुक्त करा,” अशा खोचक शब्दांत सोमनाथ गुरव यांनी आमदार राणा पाटील यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. रस्त्याच्या कामात प्रशासकीय नव्हे, तर आर्थिक हितसंबंध आणि सत्ताधाऱ्यांमधील वर्चस्ववादाचा अडथळा होता, असा गंभीर आरोपही गुरव यांनी केला आहे.

आमदार राणा पाटील यांनी शुक्रवारी शहरातील रस्त्यांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित करणार असल्याचे जाहीर करताच, महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाटील यांचा दावा म्हणजे निव्वळ ‘शब्दच्छल’ असून, ही कामे जुनीच आहेत, असे गुरव यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “या कामांना २३ फेब्रुवारी २०२४ रोजीच प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. मात्र, तब्बल १८ महिने सत्ताधाऱ्यांच्या हटवादीपणामुळे आणि अंतर्गत वादामुळे एकही निविदा उघडली गेली नाही.”

‘आंदोलनानंतरच जाग आली’

महाविकास आघाडीने जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने लढा दिल्याचे गुरव यांनी सांगितले. “आम्ही ६ जानेवारी रोजी ‘रास्ता रोको’ केला, तेव्हा कुठे प्रशासनाला जाग आली आणि २८ फेब्रुवारीपर्यंत काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन मिळाले. पण तरीही हालचाल न झाल्याने आम्ही २८ एप्रिलपासून आमरण उपोषण सुरू केले. आमच्या तिसऱ्या दिवशी पालकमंत्र्यांनी भेट देऊन काम मार्गी लावण्याचे वचन दिले,” असे सांगत गुरव यांनी संघर्षाची कहाणी मांडली. या आंदोलनामुळेच ठेकेदार अंदाजपत्रकीय दराने काम करण्यास तयार झाला आणि शहरवासियांचे तब्बल २२ कोटी रुपये वाचले, असा दावाही त्यांनी केला.


आधी पोस्टरबाजी, मग कामाला खीळ?

“ज्या कामांसाठी सत्ताधाऱ्यांनी निधी आणल्याचा गवगवा करत शहरात एकही कोपरा पोस्टरशिवाय सोडला नव्हता, त्याच कामांना प्रशासकीय मंजुरी मिळून १८ महिने का अडवून ठेवले? तुमच्या हटवादी स्वभावामुळे जनतेला त्रास का दिला?” असा थेट सवाल सोमनाथ गुरव यांनी विचारला आहे. प्रसिद्धीचा सोस असलेल्यांनी कामाच्या विलंबावर मौन का पाळले, यावरही त्यांनी बोट ठेवले.


‘विलंबाची चौकशी करा, नार्को टेस्ट करा’

गुरव यांनी सांगितले की, “हा प्रशासकीय अडथळा नव्हताच, हा तर आर्थिक हितसंबंध आणि पालकमंत्री व आमदार यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईचा परिणाम होता. आता तुम्हीच उद्घाटनाचा विषय काढल्यामुळे काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे.” या संपूर्ण प्रक्रियेला उशीर का झाला, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी अधिवेशनात केली होती. “आम्ही तर मुख्याधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. ही चौकशी झाल्यास या सत्ताधाऱ्यांचा खरा चेहरा जनतेसमोर येईल,” असा दावा करत गुरव यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आव्हान दिले आहे.

Previous Post

येरमाळा येडेश्वरी मंदिर परिसरात गावगुंडांचा राडा; सुरक्षा रक्षकासह भाविकांना मारहाण, शहर संघटकाचा मुलगाही जखमी

Next Post

सत्तेची नशा आणि अधःपतनाचा आरंभ: राणा पाटलांच्या राजकारणाचे गंभीर वळण

Next Post
जनाची नाही, तर मनाची तरी ठेवा! आमदार राणा पाटील, सत्तेसाठी गुन्हेगारांचा हात धरताना लाज कशी वाटली नाही?

सत्तेची नशा आणि अधःपतनाचा आरंभ: राणा पाटलांच्या राजकारणाचे गंभीर वळण

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मोठी कारवाई: ‘पिंजरा’ लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द; नियमभंगाचा ठपका

पिंजरा बंद झाला, आता महाकालीवर वरवंटा कधी फिरणार?

October 12, 2025
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

आंबी पोलिसांची कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

October 11, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

करजखेडा चौकातील सराफा दुकान फोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिव: जिल्हा परिषदेत बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक; गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

उमरगा: शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांकडून मारहाण; जीवे मारण्याची धमकी

October 11, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group