नळदुर्ग: मुलीचे लग्न आपल्याला न विचारता परस्पर लावून दिल्याच्या रागातून नातेवाईकांनीच पती-पत्नीला केबल आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे घडली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले नेमके?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्ला (ता. तुळजापूर) येथे २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी लक्ष्मी संजय देवकर (वय ४०) यांनी आपल्या मुलीचे लग्न नातेवाईकांना न विचारता लावून दिले होते. याचाच राग मनात धरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून लक्ष्मी देवकर यांच्या घरी गोंधळ घातला.
आरोपींनी लक्ष्मी यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी, तसेच केबल आणि काठीने जबर मारहाण करून जखमी केले. यावेळी सोडवण्यासाठी आलेले लक्ष्मी यांचे पती संजय देवकर यांनाही आरोपींनी मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
सात जणांवर गुन्हा दाखल
या घटनेनंतर लक्ष्मी देवकर यांनी २९ डिसेंबर २०२५ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी खालील सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:
१. संजय उमराव देवकर २. तेजश्री संजय देवकर ३. रविंद्र प्रकाश देवकर ४. चित्रकला रविंद्र देवकर ५. जितेंद्र प्रकाश देवकर ६. राजेंद्र जगन्नाथ देवकर ७. विनोद राजेंद्र देवकर (सर्व रा. कार्ला, ता. तुळजापूर)
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१) (स्वेच्छेने दुखापत करणे), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९, १८९(२), १९१(२) आणि १९० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.







