• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 19, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव: डीपी रस्ता कामांचे श्रेय लाटण्याचा उबाठाचा प्रयत्न, टक्केवारीसाठी त्यांनीच दिरंगाई केली – भाजपचा हल्लाबोल

admin by admin
May 4, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरातील रस्त्याला चार वर्षांपूर्वी मंजुरी ! तरीही मुहूर्त सापडेना !
0
SHARES
492
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: शहरातील डीपी रस्त्यांच्या कामांबाबत नगरविकास खात्याने दिलेल्या आदेशाचे श्रेय शिवसेना (उबाठा गट) खोटेपणाने घेत असून, हा केवळ आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रकार आहे, असा घणाघाती हल्ला भाजप नेत्यांनी केला आहे. वास्तविक हा आदेश उपमुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यासाठी दिला असून, कामांना उशीर होण्यास आणि टक्केवारीसाठी खोडा घालण्यास उबाठा गटच जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, शहराध्यक्ष अभय इंगळे आणि माजी नगराध्यक्ष अमित शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

या भाजप नेत्यांनी म्हटले आहे की, उबाठा गट त्यांच्या आंदोलनामुळेच शासनाने अंदाजपत्रकीय दराने निविदा मंजूर करण्याचा किंवा फेरनिविदा काढण्याचा आदेश दिला असल्याचा खोटा दावा करत आहे. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाची सर्व कामे राज्यात अंदाजपत्रकीय दरानेच व्हावीत, असा स्पष्ट आदेश काढला आहे. हा आदेश केवळ धाराशिवपुरता मर्यादित नाही. उबाठा गटाचा दावा म्हणजे निव्वळ धूळफेक आहे, असे भाजपने म्हटले आहे.

“नगरोत्थान योजनेतील ही कामे राज्यातील इतर शहरांमध्ये जवळपास पूर्ण झाली आहेत, पण धाराशिवमध्ये उशीर झाला. आमचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघात धाराशिव नसतानाही जनतेची गैरसोय टाळण्यासाठी पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला. मात्र, उबाठा गटाने काहीही न करता टक्केवारीसाठी कामात अडथळे आणले,” असा आरोप या पत्रकात करण्यात आला आहे. कामांना उशीर का झाला, टक्केवारीसाठी कोणी खोडा घातला आणि जिल्ह्यातील ‘टक्केवारी वसुली विद्यापीठाचे कुलगुरू व सहकुलगुरू’ कोण आहेत, हे लवकरच पुराव्यानिशी उघड करणार असल्याचा इशाराही भाजपने दिला आहे.

शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेला उबाठा गटाने लादलेली भुयारी गटार योजना जबाबदार असल्याचा ठपकाही भाजपने ठेवला आहे. “नैसर्गिक उतारा असलेल्या आणि पाच मिनिटांत पाण्याचा निचरा होणाऱ्या धाराशिव शहरात भुयारी गटार योजनेची गरज नसताना ती का आणली? यातून कोट्यवधींचा मलिदा कोणी हडप केला? कोणत्या तिघांनी स्वतःचे उखळ पांढरे केले आणि कोणी हात धुवून घेतले, हे सर्व पुराव्यासह जनतेसमोर मांडणार,” असे आव्हान भाजपने दिले आहे.

उबाठा गटाचे आंदोलन हे केवळ स्टंट असून, गेल्या पाच वर्षांतील भ्रष्ट कारभार आणि पापांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न आहे. मात्र, आम्ही हा बुरखा फाडून त्यांचा खरा चेहरा पुराव्यानिशी जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही, असे सुनील काकडे, अभय इंगळे आणि अमित शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात दोन भीषण अपघात: ट्रेलरच्या धडकेत तरुणाचा, अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Next Post

 मालकाचे १५ टक्के बुडाल्याने भाजपची फडफड, टक्केवारी विद्यापीठाचे संस्थापक राणा पाटीलच

Next Post
 मालकाचे १५ टक्के बुडाल्याने भाजपची फडफड, टक्केवारी विद्यापीठाचे संस्थापक राणा पाटीलच

 मालकाचे १५ टक्के बुडाल्याने भाजपची फडफड, टक्केवारी विद्यापीठाचे संस्थापक राणा पाटीलच

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारीचा कळस; सोनगिरीत साडेतीन लाखांची घरफोडी, तर कळंबमध्ये शेतकऱ्यांच्या पानबुड्या लंपास

August 19, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव शहर आणि परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरूच; घरफोडीत रोकड, तर शेतातून पानबुड्या लंपास

August 19, 2025
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

परंडा: बसमध्ये जागेवरून झालेल्या वादात प्रवाशाचा डोळा फुटला, एकावर गुन्हा दाखल

August 19, 2025
बारूळचा पूल: शिक्षण आणि शेतीचा जीवघेणा मार्ग; प्रशासनाला जाग कधी येणार?

बारूळचा पूल: शिक्षण आणि शेतीचा जीवघेणा मार्ग; प्रशासनाला जाग कधी येणार?

August 19, 2025
फेसबुक पिंट्या – भाग ७: आठ कोटींचे ‘वॉटर पार्क’ आणि दारुड्या शेतकऱ्याचा ‘डॅमेज कंट्रोल’

फेसबुक पिंट्या – भाग ७: आठ कोटींचे ‘वॉटर पार्क’ आणि दारुड्या शेतकऱ्याचा ‘डॅमेज कंट्रोल’

August 19, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group