• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, October 13, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

दत्ताभाऊ, तुम्ही ‘दत्त’ का नाही राहिलात?

admin by admin
June 6, 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
दत्ताभाऊ, तुम्ही ‘दत्त’ का नाही राहिलात?
0
SHARES
924
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिवच्या राजकारणात प्रत्येकाची एक प्रतिमा आहे. कुणी आक्रमक, कुणी मुत्सद्दी, तर कुणी पडद्यामागचा कलाकार. पण या सगळ्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांची ओळख होती ती एका शांत, सुस्वभावी आणि वादांपासून दूर राहणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याची. श्री सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक, गूळ पावडर कारखानदार, बँकेचे संचालक म्हणून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. राजकारणात असूनही त्यांचे पाय जमिनीवर होते. त्यामुळेच जेव्हा भाजपने दुसऱ्यांदा त्यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ घातली, तेव्हा विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनीही त्यांचे अभिनंदन केले होते.

पण राजकारणाचा खेळच निराळा. इथे कधी, कुणाला, कुणाच्या बाजूने उभे राहावे लागेल, हे सांगता येत नाही. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा पाटलांवर प्रश्नांची सरबत्ती केली. अपेक्षेप्रमाणे, आमदार राणा पाटील यांनी मौन बाळगले. मात्र, सर्वांना आश्चर्याचा धक्का देत त्यांच्या बचावासाठी पुढे आले ते दत्ताभाऊ कुलकर्णी!

ज्यांनी कधी स्वतःहून वाद ओढवून घेतला नाही, ते दत्ताभाऊ थेट  खासदार आणि आमदारांवर “पोटशूळ” उठल्याचा आरोप करत होते. विकासाची ढाल पुढे करून मूळ ड्रग्ज प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न अनेकांना रुचला नाही. ज्या दत्ताभाऊंविषयी सगळ्यांना आदर होता, ते अचानक दुसऱ्याच्या भात्यातील बाण होऊन का बरसत होते?

यावर ठाकरे सेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी थेट हल्ला चढवला. गुरव यांचा सवाल अत्यंत मार्मिक होता – “अध्यक्ष महाराज, तुम्ही पक्षाची भूमिका मांडायला आहात की कोणाची तरी वकिली करायला?” गुरव यांनी दत्ताभाऊंना त्यांच्या पूर्वीच्या भूमिकेची आठवण करून दिली. ज्यांनी जिल्हाध्यक्ष झाल्यावर ‘माझा भाऊ’ म्हणून मोठ्या मनाने कौतुक केले होते, तेच आज राजकीय भूमिकेमुळे विरोधात उभे ठाकले होते. गुरव यांनी तर थेट आव्हान दिले, “तुमच्यात पक्षनिष्ठा असेल, तर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींची पक्षातून हकालपट्टी करण्याचे धाडस दाखवाल का?”

हा सगळा गदारोळ पाहताना एक मूळ प्रश्न अनुत्तरितच राहतो – आमदार राणा पाटील स्वतः का बोलत नाहीत? प्रत्येक वेळी ते कुणालातरी पुढे का करतात?

आणि याहून मोठा प्रश्न दत्ताभाऊंच्या प्रतिमेबद्दल आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत, जेव्हा राणा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, तेव्हा दत्ताभाऊंनी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांच्या विरोधात आणि ओमराजे निंबाळकरांच्या बाजूने प्रचार केला होता. काळ बदलला, नेते बदलले, पक्ष बदलले आणि आता भूमिकाही बदलल्या. काल ज्यांच्यावर टीका केली, आज त्यांचीच ढाल बनून उभे राहणे, यालाच राजकारण म्हणत असतील, पण यात दत्ताभाऊंसारख्या मूळच्या सुस्वभावी माणसाची घुसमट होत नसेल का?

दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी जिल्ह्यात अनेकांना रोजगार दिला, स्वतःचे व्यावसायिक साम्राज्य उभे केले. त्यांची ओळख ‘कोणाचे तरी हस्तक’ म्हणून व्हावी, हे त्यांच्या हितचिंतकांनाही पटणारे नाही. सोमनाथ गुरव यांची टीका राजकीय असली तरी त्यात एक वैयक्तिक सल आहे. ‘माझा भाऊ’ आज दुसऱ्याच्या कुटुंबासाठी माझ्यावरच टीका करतोय, ही भावना त्यामागे आहे.

राजकारणाच्या सारीपाटावर सोंगट्या पुढे ढकलाव्या लागतात, हे खरे आहे. पण स्वतःची ओळख, स्वतःचा स्वभाव गहाण ठेवून दुसऱ्याच्या हातचे ‘खेळणे’ होणे, हे दत्ताभाऊंच्या आजवरच्या प्रतिमेला शोभणारे नाही.

त्यामुळेच आज त्यांचे अनेक हितचिंतक मनातल्या मनात एकच गोष्ट म्हणत असतील… “दत्ताभाऊ, तुम्ही ‘दत्त’ राहा!”

  •  सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह 
Previous Post

धाराशिवमध्ये धक्कादायक घटना: उधारीत दाढी न केल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

Next Post

उधारीत दाढी न केल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला, आरोपीवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उधारीत दाढी न केल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला, आरोपीवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मोठी कारवाई: ‘पिंजरा’ लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द; नियमभंगाचा ठपका

पिंजरा बंद झाला, आता महाकालीवर वरवंटा कधी फिरणार?

October 12, 2025
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

आंबी पोलिसांची कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

October 11, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

करजखेडा चौकातील सराफा दुकान फोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिव: जिल्हा परिषदेत बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक; गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

उमरगा: शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांकडून मारहाण; जीवे मारण्याची धमकी

October 11, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group