कळंब – ‘आमच्यावर केस का केली?’ असा जाब विचारत दोघा जणांनी मिळून एका ५५ वर्षीय शेतकऱ्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी शस्त्राने (कत्ती) मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना कळंब तालुक्यातील जवळा खुर्द शिवारात घडली आहे. याप्रकरणी पीडित शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी रंगनाथ दत्तु पवार (वय ५५ वर्षे, रा. जवळा खु., ता. कळंब, जि. धाराशिव) यांनी शिराढोण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दि. ७ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जवळा खुर्द शिवारातील शेत गट क्रमांक ३५९ मध्ये आरोपी महानंदा दत्तात्रय बोरगे आणि सागर उर्फ दादा दत्तात्रय बोरगे (दोघे रा. कळंब, ता. कळंब, जि. धाराशिव) यांनी रंगनाथ पवार यांना अडवले.
“तू आमच्यावर केस का केली?” असे म्हणत आरोपींनी पवार यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी कत्तीने मारहाण केली, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. तसेच, आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर रंगनाथ पवार यांनी दि. ९ एप्रिल २०२५ रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महानंदा बोरगे आणि सागर उर्फ दादा बोरगे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
याप्रकरणी शिराढोण पोलीस अधिक तपास करत आहेत. जुन्या भांडणाचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.