धाराशिव ते तुळजापूर दरम्यान भीषण अपघात घडला असून यात दुचाकीस्वार विनोद कालीदास काकडे (वय ४२) यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (१३ ऑगस्ट) सकाळी ५.३० वाजता बोरी पाटी येथे पिकअपने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे ते रस्त्यावर पडले आणि म्हशीला आदळले. यात गंभीर जखमी झालेल्या काकडे यांचा जागीच मृत्यू झाला.
पिकअपचालकाविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताचे बंधू तुषार उर्फ विशाल कालीदास काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पिकअपचालकाच्या हयगयी आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला.
बुलेट अपघातात एक ठार, ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ढोकी येथून मुरुडकडे जाणाऱ्या बुलेटवर ८ ऑगस्ट रोजी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात ज्ञानेश्वर खोत (३८ वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मदन कावळे (३४ वर्षे) हे बुलेट चालवत होते. कोल्हेगाव शिवारात बुलेट हायगयी व निष्काळजीपणे चालवल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मयताच्या पत्नी मनिषा खोत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मदन कावळे यांच्यावर ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कावळे यांच्यावर भादंवि कलम २८१, १०६(१), १२५(अ), १२५ (बी) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.