धाराशिव: शहरात लहान मुलांच्या भांडणातून एका तरुणाला आणि त्याच्या मित्राला जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना ८ मे २०२५ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास प्रियदर्शनी दूध डेअरीच्या पाठीमागे, बालाजी नगर येथे घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी समर्थ दत्ता जाधव (वय २० वर्षे, रा. पापनाश नगर, धाराशिव) यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबानुसार, आरोपी लहू चौधरी, अंकुश चौधरी, किशोर सुभाष चौधरी आणि अन्य एक (सर्व रा. बालाजी नगर, शेकापूर रोड, धाराशिव) यांनी ही मारहाण केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी समर्थ जाधव आणि त्याचा मित्र मारुती शिवाजी इटलकर ( वय १७ ) यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉड, लोखंडी कोयता आणि लाकडी वेळूच्या बांबूने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच, आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर समर्थ जाधव यांनी १० मे २०२५ रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९(१) (प्रोत्साहन देणे), ११८(१) (मृत्यू किंवा गंभीर दुखापत करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवणे), ११५(२) (मृत्यू किंवा आजीवन कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्यास प्रोत्साहन देणे, गुन्हा न घडल्यास), ३५२ (गंभीर प्रकोपाशिवाय मारहाण करणे), ३५१(१) (गुन्हेगारी शक्तीचा वापर) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
न्यूज अपडेट – या मारहाणीत जखमी मारुती शिवाजी इटलकर ( वय १७ ) मयत झाला आहे.
सविस्तर बातमी वाचा – धाराशिवमध्ये शाळकरी मुलीच्या छेडछाडीतून तरुणाची हत्या