• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, August 9, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नव्या जोडप्याला मूल झालं तरी राणा पाटील त्याचेच श्रेय घेतील

शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांचा घणाघात

admin by admin
March 18, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : खासदार ओमराजे निंबाळकर हे लोकसभेत जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडत असून, त्यांच्या कामामुळे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पोटात दुखत आहे. आमदार पाटील यांना केवळ फुकटचे श्रेय लाटण्याची सवय असून, उद्या एखाद्या नवीन जोडप्याला मूल जन्माला आले, तरी त्याचेही श्रेय ते घेतील इतकी खालची पातळी त्यांनी गाठली आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी केली आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच लोकसभेत रेल्वेचा प्रश्न मांडून निधीची मागणी केली होती. त्यावर भाजप व आमदार राणा पाटील यांच्या गोटातून प्रतिक्रिया देत ओमराजेंवरच खोडा घालत असल्याचा आरोप करण्यात आला होता. याला चोख प्रत्युत्तर देताना सोमनाथ गुरव यांनी राणा पाटलांवर सडकून टीका केली.

काय म्हणाले सोमनाथ गुरव?

  • श्रेयवादाचा अट्टाहास: राणा पाटील गेल्या दहा वर्षांपासून तुळजापूरचे आमदार आहेत, सत्तेत आहेत, मात्र त्यांनी कधीही सभागृहात जनतेचे प्रश्न मांडले नाहीत. दुसऱ्यांच्या कामात खोडा घालणे आणि स्थगिती देणे हाच त्यांचा खरा व्यवसाय आहे. कशाचेही श्रेय आपल्यालाच मिळाले पाहिजे, हा त्यांचा अट्टाहास आहे.

  • हुकूमशाही मानसिकता: जिल्ह्यात जे काही होईल ते फक्त राणा पाटलांच्या मर्जीनेच व्हायला हवे, अशी भाजपची आणि त्यांची विकृत मानसिकता आहे. ओमराजेंच्या रेल्वे प्रश्नावर दिलेली प्रतिक्रिया याच मानसिकतेचे दर्शन घडवते.

  • पराभवाची आठवण: जनतेचा तुमच्यावर एवढाच विश्वास असता, तर तुमच्या पत्नीला लोकसभा निवडणुकीत ३ लाख २९ हजार मतांच्या फरकाने दारुण पराभवाचा सामना करावा लागला नसता. त्यामुळे राणा पाटलांनी विकासावर बोलण्याची नैतिकता गमावली आहे.

२०१४ ते २०१९ मध्ये तुमचे हात कोणी बांधले होते?

रेल्वेच्या प्रश्नावर बोलताना गुरव यांनी राणा पाटील यांना थेट आव्हान दिले. २०१४ ते २०१९ या काळात राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि तुमचाच खासदार होता; मग तेव्हा किती रुपयांचे काम झाले याचे उत्तर आधी द्यावे. तेव्हा तुमचे हात कुणी बांधले होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. २०१९ मध्ये ओमराजे खासदार झाल्यानंतरच त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला, त्यामुळेच आज कामे मार्गी लागताना दिसत आहेत.

ओमराजेंवर कोल्हेकुईचा फरक पडणार नाही

खासदार ओमराजे हे जनतेच्या जीवावर राजकारण करतात व जनतेसाठीच काम करतात. त्यामुळे राणा पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी कितीही ‘कोल्हेकुई’ केली तरी ओमराजेंच्या कामावर त्याचा कोणताही फरक पडणार नाही. राणा पाटील यांनी ‘आपल्याशिवाय जगात कुणाला काही कळत नाही’ हा अविर्भाव आता सोडून द्यावा, असा सज्जड दमही सोमनाथ गुरव यांनी शेवटी दिला.


Previous Post

धाराशिव शहर पोलीस ठाण्यात ‘बॉस’चा धुमाकूळ! लाचखोरी, दारूच्या गाड्यांची ‘सेटिंग’ आणि आता चक्क ठाण्यातच दारूच्या बाटल्यांसोबत ‘बर्थडे सेलिब्रेशन’

Next Post

चुकीच्या ‘स्कॅनर’वर गेलेले दीड लाख रुपये महिलेला मिळाले परत!

Next Post
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

चुकीच्या 'स्कॅनर'वर गेलेले दीड लाख रुपये महिलेला मिळाले परत!

ताज्या बातम्या

“मला अजून एक बळी पाहिजे…” जुना उपळा रोडवरील जीवघेण्या खड्ड्याकडे लक्ष वेधण्यासाठी धाराशिवमध्ये नागरिकांचे उपहासात्मक होर्डिंग

“मला अजून एक बळी पाहिजे…” जुना उपळा रोडवरील जीवघेण्या खड्ड्याकडे लक्ष वेधण्यासाठी धाराशिवमध्ये नागरिकांचे उपहासात्मक होर्डिंग

August 9, 2026
साहेबांचा जुना ‘भोंगा’ आणि माऊलींचा नवा ‘सायरन’! ‘व्हिजन २०३०’ च्या गोड कल्पना आणि फसव्या घोषणा!

साहेबांचा जुना ‘भोंगा’ आणि माऊलींचा नवा ‘सायरन’! ‘व्हिजन २०३०’ च्या गोड कल्पना आणि फसव्या घोषणा!

August 8, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

August 8, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापुरात रेल्वे मार्गाच्या मोबदल्यावरून तुफान हाणामारी!

August 8, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम रोखले! कनिष्ठ अभियंत्याला धमकी देऊन शासकीय कामात अडथळा

August 8, 2026

Recent Posts

  • “मला अजून एक बळी पाहिजे…” जुना उपळा रोडवरील जीवघेण्या खड्ड्याकडे लक्ष वेधण्यासाठी धाराशिवमध्ये नागरिकांचे उपहासात्मक होर्डिंग
  • साहेबांचा जुना ‘भोंगा’ आणि माऊलींचा नवा ‘सायरन’! ‘व्हिजन २०३०’ च्या गोड कल्पना आणि फसव्या घोषणा!
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
  • तुळजापुरात रेल्वे मार्गाच्या मोबदल्यावरून तुफान हाणामारी!
  • तुळजापूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम रोखले! कनिष्ठ अभियंत्याला धमकी देऊन शासकीय कामात अडथळा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!