धाराशिव : सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट आणि होळीच्या धुलिवंदनावरून धाराशिव शहरातील गणेशनगर , खाजानगर भागात सोमवारी ( २५ मार्च ) रात्री दोन गट आमनेसामने आले होते. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करून, शांततेला गालबोट लावले तसेच पोलीस आल्यानंतर त्यांच्यावरही दगडफेक करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी जवळपास दोनशे लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी २४ जणांची ओळख पटल्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
आरोपी नामे-1)वसीम दस्तगीर शेख, 2) हज्जु शेख, रा. तालीम गल्ली, 3) अमीर उर्फ हमदू शेख, 4) मोहसीन शेख, 5) फैय्याल ईस्माईल काझी, 6) जमीर सिटी फर्निचरवाला, 7) हाजी मलंग सत्तार सय्यद उर्फ निहाल, 8) नवीद शेख रा. खाजानगर गल्ली नं 19 धाराशिव, 9) अरबाज पठाण रा. एकमिनार मस्जीदजवळ, 10) आलीम कुरेशी, 11) अरबाज शेख, 12) सलीम शेख लिमरा हॉटेलवाला, 13) गौस शेख यांचे सह 100 ते 125 इसम सर्व रा. खाजा नगर धाराशिव, 14) सागर भांडवले, 15) सौरभ काकडे, 16) निलेश साळुंके, 17) हनुमंत यादव, 18)ओमकार शामराव कोरे, 19)विनय, 20) बापू देशमुख, 21) राहुल बबन भांडवले, 22) राज निकम, 23) मनोज जाधव व यांचे सह 70 ते 80 इसम सर्व रा. गणेश नगर धाराशिव यांनी दि. 25.03.2024 रोजी 20.45 वा. सु. गणेश नगर धाराशिव येथे बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना त्यांचा जमाव हा बेकायदेशीर असुन तेथुन शांततेत निघून जाण्याबाबत समजावून सांगूनही तेथुन निघून न जाता दगड, विटा, फरशीच्या तुकडे व काचेच्या बाटल्या एकमेकांवर पोलीस पथकावर व खाजानगर आणि गणेशनगर परिसरातील राहणारे नागरिकांवर जिवे मारण्याच्या उद्देशाने दगडफेक करुन शासकीय वाहन व जनतेच्या वाहनांचे नुकसान केले व आरडा ओरडा व शिवीगाळ केल्याने जनतेत दहशत निर्माण झाली. तसेच कर्तव्यावरील पोलीस अंमलदार यांना जखमी करुन शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संदिप ओहोळ पोलीस उप निरीक्षक नेमणुक धाराशिव शहर पोलीस ठाणे यांनी दि.26.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 307, 353, 332, 143, 147, 148, 149, 336, 109, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.