बेंबळी : आरोपी नामे -मेघराज सुरेश कचरे आणि प्रेमराज सुरेश कचरे, दोन्ही रा. गोगाव ता. जि. धाराशिव यांनी तक्रारदार नामे -निलेश विनायक सुर्यवंशी, वय 38 वर्षे, रा. नांदुर्गा ता. जि. धाराशिव यांना कुत्र्याने कोंबड्या खाल्ल्यामुळे वाद करून गंभीर जखमी करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बेंबळी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे-मेघराज सुरेश कचरे, प्रेमराज सुरेश कचरे, रा. गोगाव ता. जि. धाराशिव यांनी दि.12.07.2024 रोजी 12.15 ते 12.30 वा. सु. गोगाव भंडारी येथे शेतात फिर्यादी नामे-निलेश विनायक सुर्यवंशी, वय 38 वर्षे, रा. नांदुर्गा ता. जि. धाराशिव यांना कुत्रयाने कोंबड्या खाल्या या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राडीचा दांड्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-निलेश सुर्यवंशी यांनी दि.13.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भारतीय न्याय सहिंता कलम 117 (2), 115(2), 352, 351(1) (3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूरमध्ये शेतीच्या वादावरून मारहाण
तुळजापूर: आरोपी नामे-दादाराव उर्फ विजय विजय गजेंद्र मुंडफणे, समर्थ सुधीर भोसले उर्फ मुंडफणे, नितीन हाबु, पिंटु कैकाडी चौघे रा. ढेकरी ता. तुळजापूर, कुमार उर्फ छक्कु गायकवाड, आदित्य उर्फ सोनु नन्नवरे दोघे रा हंगरगा तुळ पाटी ता. तुळजापुर जि. धाराशिव यांनी दि. 20.06.2024 रोजी सकाळी 11.00 वाजता ढेकरी येथे फिर्यादी नामे- दत्तोबा रावजी भोसले, वय 48 वर्षे, रा.भोसले गल्ली शुक्रवार पेठ तुळजापूर जि. धाराशिव यांना आणि त्यांच्या मेव्हुणाला सुरेश नेपते यांना शेतीच्या वादावरून गैरकायद्याने जमाव करून शिवीगाळ आणि लाथाबुक्यांनी, काठी, सत्तुर, लोखंडी रॉड आणि गजने मारहाण करून गंभीर जखमी केले. याचसोबत त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेवरून फिर्यादी दत्तोबा भोसले यांनी दि. 13.07.2024 रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 326, 327, 323, 427, 504, 506, 143, 147, 148 आणि 149 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.