धाराशिव – धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून पत्रकारांना बाहेर हाकलले म्हणून रागाच्या भरात जिल्हाधिकारी गेटसमोर पत्रकारांनी केवळ १० ते १५ मिनिटे धरणे धरून पालकमंत्री तानाजी सावंत यांचा निषेध केला. पण नंतर चमकोगिरी करणाऱ्या दोन पत्रकारांनी पालकमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन चक्क बूट चाटले. आम्ही तुमचेच आहोत, आमचा आंदोलनाला पाठींबा नव्हता, तुम्ही फाशी दिली तरी आम्ही तुमचेच आहोत असे तोंडी शपथपत्र दिले. त्याची रसभरीत चर्चा सध्या सुरु आहे.
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस पत्रकारांना आजवर प्रवेश नाकारण्यात आला आहे. मध्यंतरी मधुकरराव चव्हाण पालकमंत्री झाल्यानंतर प्रवेश मिळाला होता, पण मधुकरराव पायउतार होताच, पुन्हा प्रवेश नाकारण्यात आला. काल दि. १६ ऑक्टोबर रोजीही पत्रकारांना सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले. त्यानंतर काही पत्रकारांना राग आला आणि गेटसमोर पालकमंत्री तानाजी सावंत यांचा निषेध केला. त्यात काही पत्रकार लटके – लटके सहभागी झाले होते. त्यांची ही नौटंकी फक्त १० ते १५ मिनिटे सुरु होती.
सर्व पत्रकार आपापल्या कामाला निघून गेल्यानंतर चमकोगिरी करणारे दोन पत्रकार पालकमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन आमचा आंदोलनाला पाठींबा नव्हता, पत्रकारांसोबत लटके का होईना राहावे लागते, आम्ही तुमचेच आहोत, तुम्ही फाशी दिली तरी आम्ही तुमचेच आहोत असे तोंडी शपथपत्र दिले, केवळ बूट चाटण्याचे तेवढं बाकी होते. इतकी खुशमस्करी चालू होती. या बेवड्या पत्रकरांची बूट चाटण्याची पद्धत पाहून अनेकजण अवाक झाले. हे दोन बेवडे पत्रकार नेमके कोण आहेत, याची चवीने चर्चा सुरु आहे.