ढोकी – वानेवाडी शिवारात शेतजमिनीच्या वादातून एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळ गणपती चव्हाण (वय ३८) यांच्या शेतातील झाडे तोडल्याच्या कारणावरून आरोपी अण्णा साहेबराव उंबरे, बाळासाहेब साहेबराव उंबरे, मुकुंद विजयकुमार उंबरे, शरद रामराव उंबरे आणि बंडू रामराव उंबरे (सर्व रा. वानेवाडी) यांनी चव्हाण यांना गैरकायदेशीरपणे एकत्र येऊन शिवीगाळ केली. तसेच लाथा-बुक्क्या, काठी आणि खोऱ्याने मारहाण करून जखमी केले. आरोपींनी चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
या मारहाणीत जखमी झालेले गोपाळ चव्हाण यांनी ढोकी पोलीस ठाण्यात ६ फेब्रुवारी २०२५ रोजी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (भा.दं.वि.) कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२) (३), १८९ (२), १९१ (१), १९१ (३) आणि १९० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ढोकी पोलीस पुढील तपास करत आहेत.