धाराशिव : धाराशिव शहर पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिचंद्र किसन माळी (वय ६५, रा. वैराग रोड, धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. फिर्यादीनुसार, २९ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ६.३० वाजण्याच्या सुमारास वैराग रोडलगत गट क्रमांक ६८८/३ परिसरात असलेल्या फिरंगी देवी मंदिरासंदर्भात घडलेल्या घटनेत उपासना स्थळाचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी निजाम काझी उर्फ निजाम गुलाम रसुल शेख (वय ४९, रा. खाजानगर गल्ली क्र. ३, धाराशिव) तसेच जेसीबी चालक चौगुले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९८, २९९ व ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक २५०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, संबंधित कृतीमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला असून, पोलिसांनी याची नोंद घेत तपास सुरू केला आहे. घटनास्थळाची पाहणी करून छायाचित्रे घेण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंभोरे करीत आहेत.





