धाराशिव : शेतरस्त्याच्या वादातून रस्ता अडवून एका कुटुंबाला काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना धाराशिव तालुक्यातील केशेगाव – विठ्ठलवाडी शिवरस्त्यावर घडली. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात दोघांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत नागेश सिध्देश्वर वाघाळे (वय ३६, रा. केशेगाव, ता. जि. धाराशिव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी साडेसात वाजेच्या सुमारास नागेश वाघाळे हे केशेगाव विठ्ठलवाडी शिवरस्त्याने जात होते. यावेळी आरोपी सागर बबन शिंदे आणि संतोष बबन शिंदे (दोघे रा. केशेगाव) यांनी शेतरस्त्याच्या कारणावरून त्यांचा रस्ता अडवला.
नेमके काय घडले?
-
आरोपींनी फिर्यादी नागेश वाघाळे यांना शिवीगाळ करत काठीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व त्यांना जखमी केले.
-
यावेळी फिर्यादीचे चुलत भाऊ सागर, चुलते रामलिंग वाघाळे आणि चुलती शांता वाघाळे यांनाही आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली.
-
“जर पुन्हा या रस्त्याने आलात तर जिवे ठार मारू,” अशी गंभीर धमकीही आरोपींनी यावेळी दिली.
या घटनेनंतर नागेश वाघाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात आरोपी सागर बबन शिंदे आणि संतोष बबन शिंदे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १२६(२), ११८(१), ११५(२), ३५१(२)(३), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.





