तुळजापुरात देवीचा जयघोष होत असताना, पलीकडे ‘व्हाइट पावडर’चा धूरही हवेत विरत होता!
गेल्या काही आठवड्यांत उघडकीस आलेल्या एमडी ड्रग्ज रॅकेटने तुळजापूरच्या पवित्र भूमीत मोठा डाग लावला आहे. या शहरात २ ते ३ हजार तरुण व्यसनाच्या विळख्यात सापडले आहेत, पण अद्याप ‘बडे मासे’ मोकाटच आहेत!
पोलिसांनी आतापर्यंत नऊ आरोपींना पकडलं, पण हे फक्त प्यादे आहेत, वजीर अजूनही खुर्चीवर बसलाय.
‘ड्रग्ज माफिया’ वाढले कसे?
गेल्या काही वर्षांत तुळजापुरात ड्रग्ज तस्करांचं एक सिंडिकेट उभं राहिलं.
- सुरुवातीला काही लोक आपली ‘लाईफस्टाईल सुधारण्यासाठी’ नशेच्या दुनियेत उतरले.
- मग त्यांनी अजून काही ‘गोलंदाज’ तयार केले आणि ड्रग्ज विक्रीचं एक व्यवस्थित रॅकेट तयार केलं.
- राजकीय वरदहस्त आणि स्थानिक ‘काळ्या टोपीवाल्यांच्या’ पाठिंब्यामुळे या धंद्याला वेग आला.
- हॉटेल, लॉज आणि काही मोठ्या सोसायट्यांमध्ये ड्रग्जचा व्यापार सर्रास सुरू झाला.
पोलीस कोणाला पकडतात आणि कोणाला वाचवतात?
तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणात बरेच आरोपी पकडले गेले, पण खरी गँग अजूनही बाहेरच आहे.
- मूळ सूत्रधार कोण?
- या ड्रग्ज सिंडिकेटचा ‘किंगमेकर’ कोण?
- पोलिसांच्या खिशात हात टाकून आपली सुटका करून घेणारा तो ‘आक्का’ कोण?
हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.
पोलिसांच्या ‘अर्ध्या कारवाई’वर संशय!
एकीकडे गृहराज्यमंत्री म्हणतात की ड्रग्ज माफियांचं समूळ उच्चाटन केलं जाईल, पण त्याच वेळी पोलीस फक्त किरकोळ आरोपी पकडताहेत.
- ‘छोटे खेळाडू’ तुरुंगात जातायत, पण ‘बडे मासे’ अजूनही आमदारांच्या गाड्यांच्या शेजारी बसलेले आहेत.
- तीन आठवड्यांनंतरही मुख्य मास्टरमाइंडवर कारवाई नाही.
- ‘ड्रग्ज माफियां’ना पाठिंबा देणाऱ्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांवर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही.
‘आलाय बकरं, कापा!’ पण वजीराला का सोडता?
आता हा खेळ थांबायला हवा.
- तुळजापूर आणि धाराशिव जिल्ह्यात ड्रग्ज तस्करांचं समूळ उच्चाटन केलं पाहिजे.
- मुख्य सूत्रधार आणि त्यांच्या राजकीय मालकांना पकडलं पाहिजे.
- पोलिसांचा यात काही सहभाग आहे का? त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे.
तरुण पिढी संपवायची आहे की वाचवायची?
हे ड्रग्जचं रॅकेट फक्त कायदेशीर कारवाईपुरतं मर्यादित नाही. ही पिढी वाचवायची की संपवायची, याचा निर्णय आता समाजानं घ्यायचा आहे.
- तुळजापूरसारख्या धार्मिक शहरात ड्रग्ज तस्करी चालतेय, आणि आपण अजून गप्प आहोत?
- हे रॅकेट मोडायचं की अजून वाढू द्यायचं?
तुळजापुरातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी यासाठी आवाज उठवायला हवा.
कारण, हे फक्त तुळजापूरचं संकट नाही, संपूर्ण महाराष्ट्राच्या तरुणाईचं भवितव्य धोक्यात आहे!
🚩 जगदंब जगदंब! खेळ सुरू आहे, प्यादे उडवले जात आहेत… वजीर मात्र सुरक्षित! 🚩