धाराशिव – तुळजापूर येथील बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत एकूण ३६ आरोपी निष्पन्न झाले असून, यापैकी १४ आरोपींना अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे उर्वरित २२ आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नसून ते फरार आहेत.
या प्रकरणातील काही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केले होते. यापैकी तुळजापूर येथील आरोपी स्वराज उर्फ पिनू सचिन तेलंग आणि नळदुर्ग येथील इंद्रजित उर्फ मिटू रणजितसिंह ठाकूर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जांवर सुनावणी झाली.
या सुनावणीअंती अतिरिक्त सत्र न्यायाधिश मिटकरी मॅडम यांनी स्वराज उर्फ पिनू सचिन तेलंग आणि इंद्रजित उर्फ मिटू रणजितसिंह ठाकूर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
दरम्यान, मुंबई येथील आरोपी वैभव अरविंद गोळे (जी या प्रकरणातील आरोपी संगिता गोळे हिचा पती आहे) याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २४ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे आता लक्ष लागले आहे. पोलिसांसमोरील फरार २२ आरोपींना जेरबंद करण्याचे आव्हान कायम आहे.
अटकेतील सहा जणांच्या जामीन अर्जावर २४ एप्रिल रोजी सुनावणी
सध्या कारागृहात असलेल्या संदीप राठोड, अमित आरगडे युवराज दळवी ,संगीता गोळे, संतोष खोत व संकेत शिंदे या सहा जणांच्या जामीन अर्जावर 24 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे