• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, October 14, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव: १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत सरसकट कर्जमाफीचा ठराव करा…

आमदार कैलास पाटलांचे शेतकऱ्यांना आवाहन

admin by admin
August 13, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
सोलर पंप योजना म्हणजे शेतकऱ्यांना गाजर, कंपन्यांना फायदा – आ. कैलास पाटील
0
SHARES
461
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : राज्यातील शेतकरी विविध संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडला असून, त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीचा ठराव येत्या १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत मांडावा, असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामसभांमधील ठराव एकत्र करून मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार पाटील म्हणाले की, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, तीन अधिवेशने झाली तरी सरकारने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, महागडी खते व औषधे आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात आहे. शेतमालाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.

या परिस्थितीमुळे बहुतांश शेतकरी बँक आणि सावकारांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. अनेकांना थकबाकीमुळे बँकांकडून नोटिसा येत आहेत, जप्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे, तर काही शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. ही गंभीर परिस्थिती पाहता, शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी सरसकट कर्जमाफी हाच एकमेव तातडीचा आणि परिणामकारक उपाय आहे, असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

ही कर्जमाफी कोणत्याही अटी, निकष किंवा समितीच्या अभ्यासात वेळ न घालवता तातडीने जाहीर करावी. यामध्ये अल्प मुदतीचे पीककर्ज, मध्यम मुदतीचे सिंचन व उपकरण कर्ज, शेडनेट, पॉलिहाऊस, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज, तसेच सावकारी कर्जाचाही समावेश असावा, अशी मागणी या ठरावाद्वारे करण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले. १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून द्यावी, असेही ते म्हणाले.


या आहेत प्रमुख मागण्या

  • संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करावी.
  • कर्जमाफीची अंमलबजावणी बिनशर्त, पारदर्शक आणि त्वरित करावी.
  • कर्जमाफीसोबतच शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन शाश्वत शेती धोरण लागू करावे.

Previous Post

धाराशिव तालुक्यात जमिनीच्या वादातून पती-पत्नीचा निर्घृण खून, आरोपी फरार

Next Post

तहसीलदार मृणाल जाधव प्रकरण आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्याकडून चौकशीची मागणी

Next Post
धाराशिव तहसीलदार मृणाल जाधव यांच्यावर 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, एसीबीकडून चौकशीची मागणी

तहसीलदार मृणाल जाधव प्रकरण आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्याकडून चौकशीची मागणी

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मोठी कारवाई: ‘पिंजरा’ लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द; नियमभंगाचा ठपका

पिंजरा बंद झाला, आता महाकालीवर वरवंटा कधी फिरणार?

October 12, 2025
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

आंबी पोलिसांची कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

October 11, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

करजखेडा चौकातील सराफा दुकान फोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिव: जिल्हा परिषदेत बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक; गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

उमरगा: शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांकडून मारहाण; जीवे मारण्याची धमकी

October 11, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group