• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवच्या विकासाला सहा महिने ‘ब्रेक’ लावणाऱ्या राणा पाटलांची ऐन बैठकीच्या तोंडावर ‘फेसबुक’ घोषणा

 स्थगिती उठली की राजकीय खेळी?

admin by admin
October 14, 2025
in राजकारण
Reading Time: 1 min read
धाराशिवच्या विकासाला सहा महिने ‘ब्रेक’ लावणाऱ्या राणा पाटलांची ऐन बैठकीच्या तोंडावर ‘फेसबुक’ घोषणा
0
SHARES
310
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: गेल्या सहा महिन्यांपासून धाराशिव जिल्ह्याच्या विकासात खोडा घालून २६८ कोटींच्या निधीला स्थगिती आणल्याचा आरोप असलेले भाजप आमदार राणा पाटील यांनी, अखेर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या पूर्वसंध्येला स्थगिती उठवल्याची घोषणा केली आहे. मात्र, कोणत्याही शासकीय पत्राशिवाय केवळ फेसबुकवर केलेल्या या घोषणेमुळे, ही स्थगिती खरोखर उठली आहे की टीकेच्या भडिमारातून वाचण्यासाठी केलेली ही एक राजकीय खेळी आहे, अशी जोरदार चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.

एप्रिल महिन्यात जिल्हा नियोजन समितीच्या २६८ कोटींच्या विकासकामांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत मुख्यमंत्री कार्यालयातून स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती आमदार राणा पाटील यांनीच मुख्यमंत्र्यांचे कान फुंकून आणली असल्याचा गौप्यस्फोट जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनीच केल्याने मोठी खळबळ उडाली होती. यानंतर शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राणा पाटील यांना धारेवर धरले होते. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी तर राणा पाटलांच्या या कृतीमुळे जिल्ह्याचा विकास थांबल्याची कडवट टीका केली होती.

त्यावेळी, “योग्य वेळ आल्यावर स्थगिती का आणली याचा खुलासा करेन,” असे राणा पाटील यांनी म्हटले होते. मात्र, तब्बल सहा महिने उलटून गेले तरी त्यांची ‘योग्य वेळ’ काही आली नाही. खुंटलेला विकास, थांबलेली कामे यामुळे जनतेत आणि राजकीय वर्तुळात प्रचंड नाराजी असताना राणा पाटील यांनी मौन बाळगले होते.

आता जिल्हा परिषद, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यातच उद्या, १५ ऑक्टोबर रोजी, जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत विरोधक स्थगितीच्या मुद्द्यावरून रान उठवणार आणि पत्रकार प्रश्नांची सरबत्ती करणार, हे निश्चित होते. या संभाव्य कोंडीतून स्वतःची सुटका करण्यासाठीच ऐन बैठकीच्या आदल्या दिवशी राणा पाटील यांनी कोणताही पुरावा न देता फेसबुकवरून स्थगिती उठल्याची घोषणा केली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

राणा पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, “धाराशिव जिल्हा नियोजन समिती: २०२४-२५ च्या स्थगित शिल्लक निधीसह २०२५-२६ च्या निधीचा योग्य कामांसाठी वापरास मान्यता.” मात्र या घोषणेसोबत शासनाचा अधिकृत आदेश किंवा पत्र न जोडल्याने त्यांच्या हेतूवरच शंका निर्माण झाली आहे. सहा महिने जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवल्यानंतर, आता केवळ टीकेला घाबरून केलेली ही घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

Previous Post

तुळजापूर लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीतील कोट्यवधींच्या चोरीचा छडा, शिपाईच निघाला मास्टरमाइंड

Next Post

धाराशिव जिल्हा नियोजन: २४६ कोटींच्या कामांना कात्री, फक्त २२ कोटींना मंजुरी; पालकमंत्री-आमदार संघर्षाची शक्यता

Next Post
धाराशिव जिल्हा नियोजन: २४६ कोटींच्या कामांना कात्री, फक्त २२ कोटींना मंजुरी; पालकमंत्री-आमदार संघर्षाची शक्यता

धाराशिव जिल्हा नियोजन: २४६ कोटींच्या कामांना कात्री, फक्त २२ कोटींना मंजुरी; पालकमंत्री-आमदार संघर्षाची शक्यता

ताज्या बातम्या

पवनराजे निंबाळकर हत्याकांड: युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतीक्षा; २४ मार्चला तारीख ठरणार

कै. पवनराजे निंबाळकर हत्याकांड: तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १४ मे रोजी लागणार निकाल; संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!

April 20, 2026
महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

April 20, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कपडे खरेदीचा बहाणा करून दुकानातून १ लाख ९० हजारांची रोकड पळवली

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

महाळंगीत किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

१५ लाखांची खंडणी मागत कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण; जिवे मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group