• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, February 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘तुळजापूरची बदनामी’ की ‘पापावर पांघरूण’? राणादादा, आधी आरसा बघाच!

admin by admin
December 14, 2025
in सडेतोड
Reading Time: 1 min read
‘तुळजापूरची बदनामी’ की ‘पापावर पांघरूण’? राणादादा, आधी आरसा बघाच!
0
SHARES
411
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ‘लक्षवेधी क्रमांक १७५८’ मांडून शहरात वाढलेल्या अमली पदार्थांच्या विळख्याबद्दल चिंता व्यक्त केली. वरकरणी पाहता, हा प्रश्न अत्यंत गंभीर आणि समाजाच्या जिव्हाळ्याचा वाटतो. पण, या लक्षवेधीच्या निमित्ताने राणादादांनी जो ‘बदनामी’चा कांगावा केला आहे, तो पाहता “चोर तो चोर आणि वर शिरजोर” या म्हणीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.

राणा पाटलांचे म्हणणे आहे की, महायुती सरकारच्या माध्यमातून तुळजापूरचा विकास आराखडा आणि रेल्वेचे काम जोरात सुरू आहे, त्यामुळे शहराचा कायापालट होणार आहे. हे मान्य! पण विकासाच्या या गोड गुळाभोवती नको त्या मुंग्या जमल्या आहेत, त्याचे काय? राणा पाटील म्हणतात की, काही राजकीय विरोधक आणि ठराविक प्रसारमाध्यमे राजकीय द्वेषापोटी आणि आर्थिक कारणांसाठी तुळजापूरची आणि पुजाऱ्यांची बदनामी करत आहेत. त्यांनी थेट असा आरोप केला आहे की, ड्रग्स प्रकरणी खोट्या आणि अर्धसत्य बातम्या देऊन शहराची प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.

पण सत्य काय आहे? पोलिस तपासात या गुन्ह्यात तब्बल ३८ आरोपी निष्पन्न झाले असून ३० जणांना अटक झाली आहे, हे खुद्द मुख्यमंत्र्यांनी कबूल केले आहे. मग, इतक्या मोठ्या प्रमाणावर आरोपी सापडत असतील, तर त्याला ‘बदनामी’ म्हणायचे की ‘वास्तवाचा आरसा’?

माध्यमांवर आगपाखड, पण सोयीस्कर मौन

गंमत म्हणजे, राणा पाटील यांनी लेखी निवेदनात माध्यमांवर तोंडसुख घेतले, पण सभागृहात बोलताना मात्र माध्यमांचे नाव घेण्याचे धाडस त्यांना झाले नाही. का? कारण माध्यमांनी जे छापले, ते सत्य होते आणि सत्य पचवणे नेत्यांना जड जात आहे. जेव्हा जेव्हा आरशात विद्रुप चेहरा दिसतो, तेव्हा आरसा फोडण्याची जुनी खोड राजकारण्यांना असते, तेच इथे घडताना दिसत आहे.

राणादादा, तुम्ही म्हणताय की ड्रग्स प्रकरणात विरोधकांचे षडयंत्र आहे. पण या प्रकरणातील अटक आरोपींची कुंडली तपासली, तर नाळेचा संबंध थेट तुमच्या घरापर्यंत पोहोचतो, त्याचे काय? तुळजापूरमध्ये ज्या अमली पदार्थ प्रकरणाचा गाजावाजा झाला, त्यातील काही आरोपी हे भाजपचे सक्रीय कार्यकर्ते आहेत, हे लपून राहिलेले नाही.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ड्रग्स प्रकरणात नाव आलेल्या विनोद गंगणे सारख्या व्यक्तीला तुळजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपची अधिकृत उमेदवारी कोणी दिली होती? ती उमेदवारी देणारे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द राणाजगजितसिंह पाटील होते! ज्या हातांनी ड्रग्स माफियांना तिकीट वाटले, त्याच हातांनी आज विधानसभेत “तुळजापूरची बदनामी होतेय” म्हणून कागद फडकवणे, हा निव्वळ ढोंगीपणा नाही का?

पवित्र नगरीला कुणी बाटवले?

आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत अमली पदार्थांचा धंदा फोफावला, हे पाप कोणाचे? ज्या कार्यकर्त्यांना तुम्ही राजकीय ताकद दिली, जे तुमच्या पक्षाचे झेंडे घेऊन फिरतात, तेच जर एमडी (मेफेड्रॉन) सारखे विष तरुणांना विकत असतील, तर त्याची नैतिक जबाबदारी तुमची नाही का? माध्यमांनी हे सत्य बाहेर आणले म्हणून ते ‘बदनाम’ झाले का?

तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरीय समितीची मागणी केली, हे चांगलेच झाले. पण या समितीने केवळ ड्रग्स पेडलर्सचीच नव्हे, तर त्यांना राजाश्रय देणाऱ्या ‘राजकीय गॉडफादर्स’चीही चौकशी करावी. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.

केवळ विरोधकांवर आणि पत्रकारांवर खापर फोडून तुळजापूरचे पावित्र्य राखले जाणार नाही. राणादादा, जर तुम्हाला खरंच तुळजापूरची काळजी असेल, तर आधी आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या कार्यकर्त्यांची झाडाझडती घ्या. गुन्हेगारांना तिकिटे देणे थांबवा आणि मगच विधानसभेत अन्यायाची भाषा करा. तोपर्यंत हा ‘कांगावा’ जनतेला समजतोय, हे लक्षात ठेवा!

– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह

Previous Post

“टीआरपी वाढवायला ते काय ओमराजे आहेत का?” रवींद्र वाघमारेंचा भाजपला खोचक टोला

Next Post

लग्नाचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक; बनावट नवरी अडीच लाख व सोन्याचे दागिने घेऊन पसार

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

लग्नाचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक; बनावट नवरी अडीच लाख व सोन्याचे दागिने घेऊन पसार

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: ‘तुमच्यामुळे कंपनीचे नुकसान होते’ म्हणत सुरक्षा रक्षकाला १२ जणांकडून जबर मारहाण; मेंढा शिवारातील घटना

February 2, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: आर्थिक व्यवहारातून तरुणाला खोऱ्याच्या दांड्याने बेदम मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 2, 2026
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट नाही, खर्च मात्र तिप्पट झाला’; कैलास पाटलांची अर्थसंकल्पावर सडकून टीका

February 1, 2026
भूम – परंड्यात राणा पाटलांचे ‘पॉलिटिक्स’; युतीधर्म बासनात गुंडाळून तानाजी सावंतांचा ‘गेम’ करण्याची तयारी!

धाराशिव जिल्हा परिषद: “घराणेशाहीच्या स्वप्नावर पाणी फेरल्याशिवाय राहणार नाही”

February 1, 2026
लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

February 1, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group