• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘तुळजापूरची बदनामी’ की ‘पापावर पांघरूण’? राणादादा, आधी आरसा बघाच!

admin by admin
December 14, 2025
in सडेतोड
Reading Time: 1 min read
‘तुळजापूरची बदनामी’ की ‘पापावर पांघरूण’? राणादादा, आधी आरसा बघाच!
0
SHARES
419
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ‘लक्षवेधी क्रमांक १७५८’ मांडून शहरात वाढलेल्या अमली पदार्थांच्या विळख्याबद्दल चिंता व्यक्त केली. वरकरणी पाहता, हा प्रश्न अत्यंत गंभीर आणि समाजाच्या जिव्हाळ्याचा वाटतो. पण, या लक्षवेधीच्या निमित्ताने राणादादांनी जो ‘बदनामी’चा कांगावा केला आहे, तो पाहता “चोर तो चोर आणि वर शिरजोर” या म्हणीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.

राणा पाटलांचे म्हणणे आहे की, महायुती सरकारच्या माध्यमातून तुळजापूरचा विकास आराखडा आणि रेल्वेचे काम जोरात सुरू आहे, त्यामुळे शहराचा कायापालट होणार आहे. हे मान्य! पण विकासाच्या या गोड गुळाभोवती नको त्या मुंग्या जमल्या आहेत, त्याचे काय? राणा पाटील म्हणतात की, काही राजकीय विरोधक आणि ठराविक प्रसारमाध्यमे राजकीय द्वेषापोटी आणि आर्थिक कारणांसाठी तुळजापूरची आणि पुजाऱ्यांची बदनामी करत आहेत. त्यांनी थेट असा आरोप केला आहे की, ड्रग्स प्रकरणी खोट्या आणि अर्धसत्य बातम्या देऊन शहराची प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.

पण सत्य काय आहे? पोलिस तपासात या गुन्ह्यात तब्बल ३८ आरोपी निष्पन्न झाले असून ३० जणांना अटक झाली आहे, हे खुद्द मुख्यमंत्र्यांनी कबूल केले आहे. मग, इतक्या मोठ्या प्रमाणावर आरोपी सापडत असतील, तर त्याला ‘बदनामी’ म्हणायचे की ‘वास्तवाचा आरसा’?

माध्यमांवर आगपाखड, पण सोयीस्कर मौन

गंमत म्हणजे, राणा पाटील यांनी लेखी निवेदनात माध्यमांवर तोंडसुख घेतले, पण सभागृहात बोलताना मात्र माध्यमांचे नाव घेण्याचे धाडस त्यांना झाले नाही. का? कारण माध्यमांनी जे छापले, ते सत्य होते आणि सत्य पचवणे नेत्यांना जड जात आहे. जेव्हा जेव्हा आरशात विद्रुप चेहरा दिसतो, तेव्हा आरसा फोडण्याची जुनी खोड राजकारण्यांना असते, तेच इथे घडताना दिसत आहे.

राणादादा, तुम्ही म्हणताय की ड्रग्स प्रकरणात विरोधकांचे षडयंत्र आहे. पण या प्रकरणातील अटक आरोपींची कुंडली तपासली, तर नाळेचा संबंध थेट तुमच्या घरापर्यंत पोहोचतो, त्याचे काय? तुळजापूरमध्ये ज्या अमली पदार्थ प्रकरणाचा गाजावाजा झाला, त्यातील काही आरोपी हे भाजपचे सक्रीय कार्यकर्ते आहेत, हे लपून राहिलेले नाही.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ड्रग्स प्रकरणात नाव आलेल्या विनोद गंगणे सारख्या व्यक्तीला तुळजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपची अधिकृत उमेदवारी कोणी दिली होती? ती उमेदवारी देणारे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द राणाजगजितसिंह पाटील होते! ज्या हातांनी ड्रग्स माफियांना तिकीट वाटले, त्याच हातांनी आज विधानसभेत “तुळजापूरची बदनामी होतेय” म्हणून कागद फडकवणे, हा निव्वळ ढोंगीपणा नाही का?

पवित्र नगरीला कुणी बाटवले?

आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत अमली पदार्थांचा धंदा फोफावला, हे पाप कोणाचे? ज्या कार्यकर्त्यांना तुम्ही राजकीय ताकद दिली, जे तुमच्या पक्षाचे झेंडे घेऊन फिरतात, तेच जर एमडी (मेफेड्रॉन) सारखे विष तरुणांना विकत असतील, तर त्याची नैतिक जबाबदारी तुमची नाही का? माध्यमांनी हे सत्य बाहेर आणले म्हणून ते ‘बदनाम’ झाले का?

तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरीय समितीची मागणी केली, हे चांगलेच झाले. पण या समितीने केवळ ड्रग्स पेडलर्सचीच नव्हे, तर त्यांना राजाश्रय देणाऱ्या ‘राजकीय गॉडफादर्स’चीही चौकशी करावी. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.

केवळ विरोधकांवर आणि पत्रकारांवर खापर फोडून तुळजापूरचे पावित्र्य राखले जाणार नाही. राणादादा, जर तुम्हाला खरंच तुळजापूरची काळजी असेल, तर आधी आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या कार्यकर्त्यांची झाडाझडती घ्या. गुन्हेगारांना तिकिटे देणे थांबवा आणि मगच विधानसभेत अन्यायाची भाषा करा. तोपर्यंत हा ‘कांगावा’ जनतेला समजतोय, हे लक्षात ठेवा!

– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह

Previous Post

“टीआरपी वाढवायला ते काय ओमराजे आहेत का?” रवींद्र वाघमारेंचा भाजपला खोचक टोला

Next Post

लग्नाचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक; बनावट नवरी अडीच लाख व सोन्याचे दागिने घेऊन पसार

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

लग्नाचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक; बनावट नवरी अडीच लाख व सोन्याचे दागिने घेऊन पसार

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम शहरात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला!

July 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात ‘उपोषणाचा अर्ज’ दिल्याच्या रागातून घरावार जीवघेणा हल्ला!

July 11, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

कळंब तालुक्यात सावकारी त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या! हावरगाव शिवारात लिंबाच्या झाडाला घेतला गळफास; कोल्हे दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल

July 11, 2026
धाराशिव पीक विमा: उच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांना धक्का, कंपनीला दिलासा

हरवलेल्या विवाहित महिलेला शोधून न्यायालयात हजर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

July 10, 2026
‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

July 10, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group