• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, July 4, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर विरोधकांची आंदोलनाची नौटंकी

- शिवसेना जिल्हाप्रमुख साळुंके

admin by admin
January 7, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर विरोधकांची आंदोलनाची नौटंकी
0
SHARES
765
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव शहरातील भुयारी गटार योजनेमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आलेल्या 140 कोटी रुपयांच्या निधीच्या कामाला सुरुवात होत असतानाच विरोधकांनी आंदोलनाची नौटंकी सुरू केली असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केला आहे. त्यांनी विरोधकांवर घणाघात करत महाविकास आघाडीच्या या कृतीवर टीका केली आहे.

जिल्हाप्रमुख साळुंके म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात भुयारी गटार योजनेच्या नावाखाली भ्रष्टाचार करून कामे रखडवून ठेवली गेली. परिणामी, धाराशिव शहरातील नागरिकांना चिखल, खड्डे, अपघात आणि वाहनांच्या नुकसानीचा सामना करावा लागला. या त्रासामुळे एका तरुण उद्योजकाचा मृत्यू देखील झाला होता.

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, शिवसेनेने या समस्येची गंभीर दखल घेतली. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली. त्यानुसार, 140 कोटी 58 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आणि कामाला सुरुवात झाली. मात्र, आता विरोधक या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप साळुंके यांनी केला.

“भुयारी गटार योजना गरजेची होती का? ती आणण्याचा निर्णय योग्य होता का?” या प्रश्नांची उत्तरे विरोधकांनी द्यावीत, अशी मागणीही साळुंके यांनी केली आहे. धाराशिवकर जनता या आंदोलनाची नौटंकी ओळखून त्याला पाठिंबा देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Previous Post

नाक दाबले नि तोंड उघडले ! धाराशिवकरांच्या आंदोलनाने नगर परिषद प्रशासन नमले

Next Post

धाराशिव: शाहूनगरमधील रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात नागरिकांचा आक्रोश

Next Post
धाराशिव: शाहूनगरमधील रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात नागरिकांचा आक्रोश

धाराशिव: शाहूनगरमधील रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात नागरिकांचा आक्रोश

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिराचा कायापालट होणार, दोन हजार कोटींचा आराखडा सादर

तुळजापुरात ८ पुजाऱ्यांवर बंदीची कुऱ्हाड, तंबाखू खाऊन थुंकणे पडले महागात!

July 3, 2025
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

July 3, 2025
शेतकऱ्यांना फसवू नका, तळतळाट ओढवून घेऊ नका…

शेतकरी उत्पादक कंपन्यांना ‘भारत डाळ’ योजनेत समाविष्ट करा

July 3, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव शहरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट; कोर्ट, भाजप कार्यालय परिसरातून तीन वाहने लंपास

July 3, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धारूर येथे पाण्याच्या बोरची चावी मागितल्याच्या कारणावरून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

July 3, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group