• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, April 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मराठा समाजाला तापवू नका नाहीतर काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर जरांगे - पाटील यांचा सरकारला गर्भित इशारा

admin by admin
November 1, 2023
in मराठवाड़ा
Reading Time: 1 min read
मराठा समाजाला तापवू नका नाहीतर काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या
0
SHARES
282
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

जालना – मराठा समाजाला जाणून बुजून तापवलं जातंय. तुम्हाला माझ्याशी जे बोलायचं आहे ते इथे येऊन बोला आणि नसाल येणार तर नका येऊ. मग काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या; अशी स्पष्टोक्ती मनोज जरांगे पाटील यांनी आज (ता. १ नोव्हेंबर) उपोषणस्थळी दिली.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून राज्यभर आंदोलन सुरू आहे. सध्या या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून राज्यात ओबीसी समाजाच्या नेत्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. या बैठकीतून हिंसक आंदोलनामुळे मराठा समाजाची बदनामी होत असल्याचा सूर निघाला. तसंच, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काहीसा वेळ लागणार असल्याने मनोज जरांगे – पाटील यांनी सहकार्य करण्याची अपेक्षा या बैठकीत व्यक्त झाली.

या बैठकीत मंजूर झालेल्या ठरावावर बोलण्यासाठी उपोषणस्थळी जरांगे – पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारचा समाचार घेत त्यांना थेट इशाराच दिला आहे.

जरांगे – पाटील म्हणतात, “सरकारला वेळ द्यायचा की नाही हे समाजासोबतच्या चर्चेनंतर ठरवू. गोर-गरीब मराठ्यांच्या लेकरांकडे लक्ष द्यायचं सोडून सरकार बैठका घेतंय. मराठ्यांना हसण्यावारी नेतंय. याला काय सरकार म्हणायचं का? आम्ही ऐकतो म्हणून आमच्याशी कसंही वागणार का? गोर-गरीबांच्या लेकरांवर गुन्हे दाखल करायचं काम सरकार करतंय.”

ते पुढे सरकारला इशारा देताना म्हणाले की, “आता वेळ मागतायत तर इतके दिवस काय करत होते? मराठा समाजाला जाणून बुजून तापवलं जातंय. जे काही बोलायचं इथे येऊन बोला. तिकडून गप्पा मारू नका. आज संध्याकाळपासून मी पाणीच सोडणार आहे. मी उपोषण सोडणारच नाही. इथे येऊन बोला, इथे येताना तुमचं आमचे मराठे रक्षण करतील आणि नसाल येणार तर नका येऊ. मग काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या.”

जरांगे पाटील असंही म्हणाले की, “मला म्हणतात मंत्र्यांना अरे – तुरे बोलू नका. यांना अरे-तुरे बोललं तर वाईट वाटतं मग गरीब मराठ्यांच्या लेकरांवर तुम्ही अन्याय करता तेव्हा काहीच कसं वाटत नाही. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार का? याचं उत्तर द्या मग तुम्हाला किती आणि कसा वेळ द्यायचा हे आम्ही बघतो. आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. सर्वपक्षीय ठराव कसला करता? कागदी घोडे नाचवू नका.”

Previous Post

मनोज जरांगे- पाटील यांनी सहकार्य करत उपोषण मागे घ्यावं …

Next Post

उर्वरित ५ तालुक्यांचा देखील लवकरच दुष्काळी तालुक्यात समावेश होणार

Next Post
उर्वरित ५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

उर्वरित ५ तालुक्यांचा देखील लवकरच दुष्काळी तालुक्यात समावेश होणार

ताज्या बातम्या

पवनराजे निंबाळकर हत्याकांड: युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतीक्षा; २४ मार्चला तारीख ठरणार

कै. पवनराजे निंबाळकर हत्याकांड: तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १४ मे रोजी लागणार निकाल; संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!

April 20, 2026
महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

April 20, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कपडे खरेदीचा बहाणा करून दुकानातून १ लाख ९० हजारांची रोकड पळवली

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

महाळंगीत किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

१५ लाखांची खंडणी मागत कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण; जिवे मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group