• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उरुसात नियमांची पायमल्ली: जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षाचा ठेकेदारांचा फायदा

admin by admin
January 16, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
उरुसात नियमांची पायमल्ली: जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षाचा ठेकेदारांचा फायदा
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: हजरत ख्वाजा शमशोद्दिन यांच्या उरुसात आपत्ती व्यवस्थापन नियमांना धुडकावून ठेकेदारांनी मनमानी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नियमांचे उल्लंघन करताना ना हरकत प्रमाणपत्र नसतानाही पाळण्याचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासन आणि वक्फ बोर्डाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात दिलेले निर्देश पाळले जात नसल्याचे दिसून आले आहे. अग्निशमन दलाच्या वाहनांसाठी रस्त्यांची उपलब्धता ठेवण्याचे निर्देश दिले होते, मात्र प्रत्यक्षात ते वाहन देखील जाऊ शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. या मुद्द्यावर जिल्हा वक्फ बोर्डाचे अधिकारी शांत राहून आपली जबाबदारी झटकताना दिसत आहेत.

सुरक्षेची मोठी हलगर्जी

उरुसाचे मुख्य आकर्षण असलेला पाळणा नेहमीच चर्चेत असतो. यंदाही विमा आणि ना हरकत प्रमाणपत्रासारख्या महत्त्वाच्या परवानग्या विचारात घेतल्या गेल्याचा पुरावा नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिले नसतानाही पाळणा सुरू आहे. जिल्हा प्रशासन आणि वक्फ बोर्डाच्या निष्काळजीपणामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासीनता

राज्य महामार्ग क्रमांक 203 वरील अतिक्रमणाचा मुद्दाही उरूसाच्या गोंधळात समोर आला आहे. ठेकेदाराने व्यापाऱ्यांना जागा भाड्याने देऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा केला आहे. याबाबत स्थानिक व्यापाऱ्यांनी तक्रारी केल्या, तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शेषेराव चव्हाण आणि पी. डी. मोरे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाचा शब्दच्छल

नियमभंगाच्या बातम्या प्रसारमाध्यमांत आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने एक पत्रक काढून आपली जबाबदारी झटकली. यात कारवाईऐवजी ‘कार्यवाही’ असा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची गंभीर भूमिका समोर आली असून दोषींवर कोणतीही ठोस कारवाई करण्याचे संकेत मिळत नाहीत.

ठोस कारवाईची मागणी

उरुसामध्ये आपत्ती व्यवस्थापन नियम पाळले जावेत, यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलून ठेकेदारांच्या मनमानीला चाप लावावा, अशी नागरिकांची मागणी आहे. तसेच जिल्हा वक्फ बोर्ड आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Previous Post

“नगरसेवक स्वप्नांचे धडाडते स्टंट: धाराशिवमधील उपोषणाची जादू आणि शिवसेनेचे ‘कामगिरी’ साम्राज्य”

Next Post

धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

Next Post
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

ताज्या बातम्या

बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

September 10, 2026
‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

September 10, 2026
“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026

Recent Posts

  • बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?
  • स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
  • ‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!
  • “दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”
  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!