• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, December 17, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भुलथापा मारणे आणि हवेत घोषणा करणे, हेच राणा पाटील यांचे कर्तृत्व; सोमनाथ गुरव यांचा घणाघात

admin by admin
November 25, 2025
in राजकारण
Reading Time: 1 min read
‘टीका करायला नाही, तर काम करायला आलेय’; सासूबाईंचे आशीर्वाद घेऊन संगीता गुरव यांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग!
0
SHARES
225
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: “भुलथापा मारणे आणि हवेतल्या गप्पा करून जनतेची फसवणूक करणे, एवढेच राणा पाटील यांचे कर्तृत्व आहे. त्यांचा विकास हा केवळ कागदावर असून, प्रत्यक्षात होणाऱ्या विकासाला आडकाटी आणणे हीच त्यांची खरी ओळख आहे,” अशी घणाघाती टीका शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी केली आहे. राणा पाटील यांनी मांडलेल्या शहर विकासाच्या पाच मुद्द्यांचा समाचार घेताना गुरव यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

राणा पाटील यांनी नुकतेच भविष्यातील शहर विकासाचे पाच ठळक मुद्दे मांडले होते, यावर बोलताना सोमनाथ गुरव यांनी प्रत्येक मुद्द्यावर आक्षेप घेतला आहे.

पाणीपुरवठा आणि रस्ते निधीवरून टीका

पहिल्या मुद्द्याचा समाचार घेताना गुरव म्हणाले की, “नियमित पाणीपुरवठा करण्याचा संकल्प राणा पाटलांनी सोडला, पण ते पाणी कसे देणार हे सांगितले नाही. त्यामुळे हा मुद्दा हवेत गप्पा मारल्यासारखा झाला आहे.” रस्त्यांच्या निधीबाबत बोलताना गुरव यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “मर्जीतल्या गुत्तेदाराला काम मिळावे म्हणून रस्त्याच्या कामाची प्रक्रिया २० महिने याच राणा पाटलांनी राबवू दिली नाही. शहरवासीयांना जो त्रास झाला, त्याला तेच जबाबदार आहेत.”

तसेच, ज्या शहरात भुयारी गटार योजना राबवली जाते, तिथे रस्त्यासाठी ५०० कोटींचा निधी मिळत असतो. मात्र, शहराला केवळ १४० कोटी मिळाले. म्हणजे शहराच्या हक्काचा ३६० कोटींचा निधी राणा पाटील यांना आणता आला नाही, असेही गुरव यांनी नमूद केले.

कचरा डेपो आणि उद्यानांचा प्रश्न

सफाई व कचरा डेपोचा प्रश्न सोडवण्याच्या आश्वासनावर गुरव यांनी प्रतिप्रश्न केला की, “गेल्या ४ वर्षांचा प्रशासक काळ असो किंवा २०१९ पर्यंत आमदारकी, सत्ता तुमच्याच हाती होती. मग तेव्हा हा प्रश्न का सुटला नाही? त्यावेळी कंत्राट तुमच्याच लोकांकडे होते. आता पुन्हा तेच करण्यासाठी तुम्ही सत्ता मागत आहात का?”

उद्यान निर्मितीसाठी ५ वर्षांत २५ कोटी आणण्याच्या मुद्द्यावर बोलताना गुरव यांनी महाविकास आघाडीच्या कामांची आठवण करून दिली. “खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून तीन बगीचांसाठी ७ कोटी व आठवडी बाजारासाठी १० कोटी असा निधी मंजूर झाला होता. मात्र, महायुतीचे सरकार येताच या कामांना स्थगिती देण्यात आली. २०२२ पासून ही कामे का केली नाहीत, याचे उत्तर राणा पाटलांनी द्यावे,” असे आव्हान गुरव यांनी दिले.

‘पारदर्शक प्रशासना’चा दावा फोल

पाचवा मुद्दा असलेल्या ‘पारदर्शक प्रशासना’वर बोलताना गुरव यांनी टोला लगावला की, “जनतेने जिल्हा परिषद आणि २०१६ पर्यंत तुमच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेचा कारभार पाहिला आहे. त्यामुळे यावर आपण न बोललेलेच बरे.”

डिसेंबर २०२१ पासून पालिकेवर प्रशासक आहेत आणि २०१४ ते २०१९ या काळात राणा पाटीलच आमदार होते. तरीही, निवडणुकीच्या तोंडावर नुसत्या थापा मारणे आणि हवेत बोलणे सुरू आहे, अशी टीका सोमनाथ गुरव यांनी केली आहे.

Previous Post

लग्नाचे आमिष अन् मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा बहाणा; ४९ वर्षीय महिलेवर अत्याचार

Next Post

व्हिडीओ व्हायरल: धाराशिवच्या आठवडी बाजारात ‘खाकी’चा लिलाव! केळीच्या गाड्यावर १० हजारांचे ‘तोडपाणी’; ‘झिरो’मार्फत स्वीकारली ‘लक्ष्मी’

Next Post
व्हिडीओ व्हायरल: धाराशिवच्या आठवडी बाजारात ‘खाकी’चा लिलाव! केळीच्या गाड्यावर १० हजारांचे ‘तोडपाणी’; ‘झिरो’मार्फत स्वीकारली ‘लक्ष्मी’

व्हिडीओ व्हायरल: धाराशिवच्या आठवडी बाजारात ‘खाकी’चा लिलाव! केळीच्या गाड्यावर १० हजारांचे ‘तोडपाणी’; ‘झिरो’मार्फत स्वीकारली ‘लक्ष्मी’

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिरात भाविक महिलांनीच पकडले चोरट्यांना; गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांचा ८ तास विलंब, महिलांचा संताप

तुळजाभवानी मंदिरात भाविक महिलांनीच पकडले चोरट्यांना; गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांचा ८ तास विलंब, महिलांचा संताप

December 17, 2025
तुळजापुरात थरार! पिटू गंगणे – ऋषी मगर राड्यात काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी

‘सत्ते’चा माज की पराभवाची भीती? तुळजापुरात राणा पाटलांच्या पोसलेल्या गुंडांचा नंगानाच!

December 17, 2025
तुळजापूरची अवस्था बिहारपेक्षा वाईट! माजी नगराध्यक्षा मंजुषा मगर यांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

तुळजापूरची अवस्था बिहारपेक्षा वाईट! माजी नगराध्यक्षा मंजुषा मगर यांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

December 16, 2025
तुळजापुरात थरार! पिटू गंगणे – ऋषी मगर राड्यात काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी

तुळजापुरात थरार! पिटू गंगणे – ऋषी मगर राड्यात काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी

December 16, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तुळजापुरात दोन गटात जोरदार राडा; पिटू गंगणे आणि ऋषी मगर भिडले… , वाहतूक ठप्प…

December 16, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group