धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या मारहाणीच्या घटना घडल्या आहेत.
पहिली घटना: राजुरी येथे १२ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी २.३० वाजता बालाजी तानाजी चव्हाण (वय ४५ वर्षे) यांनी रामा सुभाष पवार (वय ३९ वर्षे) यांना “तू परड्या माझ्या घराकडे का आणल्या नाहीस” असे म्हणून शिवीगाळ केली आणि लाथाबुक्यांनी व विटाने मारहाण करून जखमी केले. रामा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ११८(१), ३५२, ३३२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुसरी घटना: सुंभा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर १२ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता सचिन इंद्रजीत वाघमारे (वय २८ वर्षे) आणि विजय वाघमारे (वय २७ वर्षे) यांनी रामेश्वर पांडुरंग सुरवसे (वय २७ वर्षे) यांना आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी व लोखंडी सळईने मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. रामेश्वर सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ११८(१), ३५२, ३५१(२) (३),३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.