• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, October 13, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर विकास आराखड्यावर नागरिकांचे आक्षेप; पालकमंत्री सरनाईक यांनी घेतली गंभीर दखल

पुढील बैठक १७ सप्टेंबरला

admin by admin
August 15, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजापूर विकास आराखड्यावर नागरिकांचे आक्षेप; पालकमंत्री सरनाईक यांनी घेतली गंभीर दखल
0
SHARES
788
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासंदर्भात स्थानिकांच्या आक्षेपांवर सुनावणी न घेणे हा न्यायालयीन प्रक्रियेचा भंग आहे, अशा शब्दांत पालकमंत्री तथा तुळजापूर विकास आराखडा समितीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात आज (१५ ऑगस्ट) रोजी पालकमंत्री आणि तुळजापूरच्या स्थानिक नागरिकांमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत नागरिकांनी आराखड्याविषयी तीव्र आक्षेप नोंदवल्याने आता पुढील बैठक १७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

स्थानिक नागरिकांनी तक्रार केली की, विकास आराखड्याचे सादरीकरण (प्रेझेंटेशन) त्यांना कधीही दाखवण्यात आले नाही. यावर पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पुढील आठवड्यात बैठक घेऊन सादरीकरण दाखवण्याचे निर्देश दिले. तसेच, या आराखड्याला किती लोकांची संमती आहे, याची लेखी माहिती सादर करण्यासही सांगितले. “स्थानिकांच्या घरांवर बुलडोझर फिरवला जाणार नाही,” असा विश्वासही त्यांनी यावेळी नागरिकांना दिला.

‘आणखी किती जागा द्यायची?’ – नागरिकांचा सवाल

बैठकीत नागरिकांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, यापूर्वी १९८८ आणि २०१२ मध्ये मंदिर विकासासाठी जागा देण्यात आली आहे आणि त्यावेळी कोणताही विरोध झाला नव्हता. मात्र, आता आणखी किती जागा द्यायची, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. मंदिराजवळील अनेक घरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असून त्यांना ‘हेरिटेज’ दर्जा देण्याची मागणीही नागरिकांनी केली.

एकाच वास्तुविशारदावर संशय आणि प्रशासकीय दिरंगाई

या संपूर्ण आराखड्यासाठी केवळ हेमंत पाटील हेच वास्तुविशारद (आर्किटेक्ट) का आहेत आणि ते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे ऐकत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला. पहिल्या आराखड्यात नसलेली घरे दुसऱ्या आणि तिसऱ्या आराखड्यात कशी समाविष्ट झाली, याबद्दलही नागरिकांनी संशय व्यक्त केला.

विशेष म्हणजे, पालकमंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याची पूर्वकल्पना असूनही बाधित नागरिकांना प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. याबाबत तहसीलदार समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आता सर्वांचे लक्ष १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पुढील बैठकीकडे लागले आहे. या बैठकीत प्रशासनाकडून तोडगा निघणार की नागरिकांचा विरोध कायम राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Previous Post

विद्यार्थी शून्य, सुविधा शून्य, तरीही पगार सुरू! धाराशिव जिल्ह्यातील ‘अजब’ शाळेचा ‘गजब’ कारभार !

Next Post

भूममध्ये वाईन शॉप चालकाकडे खंडणीची मागणी, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

भूममध्ये वाईन शॉप चालकाकडे खंडणीची मागणी, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मोठी कारवाई: ‘पिंजरा’ लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द; नियमभंगाचा ठपका

पिंजरा बंद झाला, आता महाकालीवर वरवंटा कधी फिरणार?

October 12, 2025
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

आंबी पोलिसांची कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

October 11, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

करजखेडा चौकातील सराफा दुकान फोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिव: जिल्हा परिषदेत बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक; गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

उमरगा: शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांकडून मारहाण; जीवे मारण्याची धमकी

October 11, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group