नळदुर्ग – तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील ‘आपले घर’ बालगृहातून एका १४ वर्षीय मुलाला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा हुपरी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील रहिवासी असलेला पृथ्वीराज हरी काळे (वय १४ वर्षे) हा मुलगा सध्या नळदुर्ग येथील ‘आपले घर’ बालगृहात वास्तव्यास होता.
दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० ते १.०० वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने कोणत्याही कारणास्तव त्याला बालगृहातून फूस लावून पळवून नेले. बालगृहाच्या परिसरात शोध घेऊनही मुलगा मिळून न आल्याने अखेर पोलिसांत धाव घेण्यात आली.
पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
याप्रकरणी बालगृहाचे बाल अधीक्षक संदीप राजेंद्र चवले (वय ३० वर्षे, रा. जेवळी, ता. लोहारा, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १८ ऑगस्ट २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नळदुर्ग पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




