• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, February 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

फक्त पंचनामा व घोषणा नको,शेतकऱ्यांना पेरणी अगोदर मदत हवी !

आमदार कैलास पाटील यांची सचिवाकडे मागणी

admin by admin
May 24, 2024
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
फक्त पंचनामा व घोषणा नको,शेतकऱ्यांना पेरणी अगोदर मदत हवी !
0
SHARES
475
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – जिल्हयात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान,  दुष्काळ सदृश्य मंडळांना दुष्काळी मदत फक्त पंचनामे व  घोषणा न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर पेरणीपुर्व जमा करावी, फक्त घोषणा करून शेतकऱ्याची फसवणूक करू नये असे मत आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिव डॉ.सोनीया सेठी यांची भेट घेऊन जिल्ह्यात झालेल्या परिस्थितीची माहिती आमदार पाटील यांनी दिली.

धाराशिव जिल्हयात मागील चार दिवसापासुन अवकाळी पाऊस,गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेतीपिकांचे, फळबागांचे, जनावरांचा मृत्यू, राहती घरे, जनावरांचे गोठे, कुक्कुटपालन शेड  यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळणे आवश्यक आहे.

सध्या पेरणीचे दिवस जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी बि-बियाणे, खते आणण्यास पैसे उपलब्ध नाहीत.फक्त पंचनामे, घोषणा न करता पेरणीपुर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणे गरजेचे आहे. धाराशिव जिल्हयात ११ एप्रिलनंतर  २०एप्रिल रोजी अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे व फळबागांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते.

३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळ पिकाना सोडुन जिरायत पिका खालील ४०२ बाधित शेतकऱ्यांच्या १४१ हेक्टर बाधित क्षेत्रासठी रक्कम रु. १३ हजार ६०० प्रमाणे १९ लाख रुपये मिळणे आवश्यक आहे. ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळ पिके सोडुन बागायत  पिका खालील २०९ बाधित शेतकऱ्यांच्या ७३.५० हेक्टर बाधित क्षेत्रासठी रक्कम रु. २७ हजार प्रमाणे रु.१९ लाख , ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळ पिका खालील २०३१ बाधित शेतकऱ्यांच्या १२२०.६० हेक्टर बाधित क्षेत्रासठी रक्कम. ३६ हजार प्रमाणे रक्कम रु.४३९ लाख असे एकूण २६४२ शेतकऱ्यांना रक्कम ४७८ लाख रुपये मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडुन आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सादर झाला आहे. हा प्रस्ताव तात्काळ मागवुन शेतकऱ्यांना पेरणीपुर्वी नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असताना अजूनही प्रस्ताव प्रलंबित आहे.

धाराशिव जिल्हयात धाराशिव, लोहारा, वाशी या तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असुन उर्वरीत कळंब, तुळजापुर, उमरगा, भुम, परंडा तालुक्यातील ३३ मंडळांना दुष्काळ सदृष्य म्हणुन नोव्हेंबर मध्ये घोषीत करण्यात आले.  या तालुक्यांतील शेतकऱ्यांना दुष्काळ बाबत ज्या सवलती देणार ते देणार अशी घोषणा केली होती. स्वत:ला निर्णय वेगवान गतीमान सरकार म्हणवुन घेणाऱ्या घोषणाबाज सरकारने या तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत दुष्काळाची एक रुपयाचीही मदत दिली नाही.  त्यामुळे फक्त घोषणा व पंचनामे न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळाचे अनुदान पेरणीपुर्व जमा करणे आवश्यक होत.जिल्हयात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, दुष्काळ सदृश्य मंडळांना दुष्काळी मदत न देता फक्त घोषणा व मदत देण्याचा फार्स केला जात आहे. गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर पेरणीपुर्व अनुदान जमा करण्याची मागणी आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी केली आहे.

Previous Post

वाशी तालुक्यातील केळेवाडीत ‘खेकडा’ म्हटल्याने बेदम मारहाण

Next Post

नळदुर्गजवळ भीषण अपघात, एक ठार, पाच जखमी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

नळदुर्गजवळ भीषण अपघात, एक ठार, पाच जखमी

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

मोहा शिवारातून ७५ हजार रुपये किमतीच्या तीन मुऱ्हा म्हशींची चोरी; कळंब पोलिसांत गुन्हा दाखल

February 23, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

गुंजोटीत बंद घराचे कुलूप तोडून दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

February 23, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

वालवड येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरी; कुलूप तोडून २० हजारांची रोकड पळवली

February 23, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

केशेगाव येथे शेतरस्त्याच्या वादातून कुटुंबाला बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

February 23, 2026
‘तारा’च्या नावाखाली जमिनींवर ‘डोळा’! शेतकऱ्यांना स्वप्न ‘अणुऊर्जे’ची, आणि प्रत्यक्षात ‘प्लॅनिंग’ जमिनी लाटण्याची?

‘तारा’च्या नावाखाली जमिनींवर ‘डोळा’! शेतकऱ्यांना स्वप्न ‘अणुऊर्जे’ची, आणि प्रत्यक्षात ‘प्लॅनिंग’ जमिनी लाटण्याची?

February 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group