• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यातील संचारबंदी उठवली

आज सायंकाळी पाच वाजल्यापासून सर्व व्यवहार सुरु होणार

admin by admin
November 1, 2023
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
मराठा आंदोलनाला हिंसक वळण : धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात मंगळवारी लागू करण्यात आलेली संचारबंदी आज ( बुधवार ) रोजी सायंकाळी पाच वाजता उठवण्यात आली आहे. संचारबंदीचा हा आदेश रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले.

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे – पाटील यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरु केल्यानंतर त्यांना पाठींबा देण्यासाठी जिल्हाभरात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली तसेच अनेक ठिकाणी कॅण्डल मोर्चा काढण्यात आला. तसेच अनेक ठिकाणी रस्ता रोको आंदोलन कऱण्यात आले. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने तसेच एसटीची जाळपोळ केल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी मंगळवारी संचारबंदी लागू केली होती.

मंगळवारी जिल्ह्यात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. एक – दोन किरकोळ प्रकार वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे आज ( बुधवार ) रोजी सायंकाळी पाच वाजता संचारबंदीउठवण्यात आली आहे. संचारबंदीचा हा आदेश रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले.

आज सायंकाळी 5 वाजेपासून धाराशिव जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल करण्यात आलेली आहे. तथापि जमावबंदी व शस्त्रबंदी लागू असेल.

जिल्ह्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध भागात धरणे, आंदोलने,रस्तारोको व उपोषणे सुरू आहे.उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस जाळण्यात आली. शेजारच्या बीड जिल्ह्यात आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडलेल्या आहेत.या घटनांच्या पडसादामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यात चालू असलेल्या आंदोलनामुळे सार्वजनिक व खाजगी मालमत्तेस मोठ्या प्रमाणात हानी पोहोचत आहे.त्यामुळे जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 (2) चे संचारबंदीचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी लागू केले होते.

संचारबंदी कालावधीत बंद असलेली मद्यविक्री दुकाने आजपासून सुरु

मराठा समाजास कुणबी आरक्षण देण्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध भागात धरणे, आंदोलने, रस्ता रोको, उपोषण आदी चालू आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टिने जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.

जिल्ह्यामध्ये 30 ऑक्टोंबरपासून लागू करण्यात आलेले संचारबंदी आदेश आज 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजतापासून रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्त्यांचे बंद करण्यात आलेले व्यवहार आज सायंकाळी 5 वाजेपासून पुढे सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांनी दिले आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर

Next Post

मनोज जरांगे- पाटील यांनी सहकार्य करत उपोषण मागे घ्यावं …

Next Post
मनोज जरांगे- पाटील यांनी सहकार्य करत उपोषण मागे घ्यावं …

मनोज जरांगे- पाटील यांनी सहकार्य करत उपोषण मागे घ्यावं ...

ताज्या बातम्या

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026
दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

September 5, 2026
तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

September 5, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी

September 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा

September 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
  • दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम
  • तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!
  • धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी
  • उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!