धाराशिव : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेनंतर धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीची नवी कार्यकारिणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीत विविध पदांवर अनुभवी तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे.
जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी दौलतराव नामदेवराव माने, विलास बाळासाहेब शाळू, नाना दादाराव भोसले, ॲड. सय्यद हुसेन फिरसाहेब इनामदार, आयुब खान अजीज खान पठाण, सयाजीराव विजयकुमार देशमुख, सरफराज हमीद काझी, बाळासाहेब किसनराव गपाट, विजय महेंद्र वाघमारे, ॲड. जावेद रफिउद्दीन काझी, शामराव गणपत भोसले, राजेंद्र पांडुरंग शेंडगे आणि गौरीशंकर सिद्धप्पा मुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खजिनदारपदी अशोक त्र्यंबकराव शेळके यांची निवड करण्यात आली.
सरचिटणीसपदी नितीन शिवलिंग गाडवे, रमेशसिंह परदेसी (गोकुळसिंह), मधुकर पांडुरंग यादव, नादेर उल्ला कलीम उल्ला हुसेनी, बालाजी रूपचंद राठोड, रामचंद्र आलुरे आणि दिलीपराव भोकरे यांना संधी देण्यात आली आहे.
सचिवपदी अशोक प्रभाकर भातलवांडे, अनंतराव साहेबराव घोगरे, श्रीकांत पुरुषोत्तम भालेराव, गजेंद्र हरिदास कदम, बालाजी गजेंद्र बंडगर आणि ॲड. दिलीप शंकरराव सागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय विशेष निमंत्रित म्हणून धीरज अप्पासाहेब पाटील, विश्वास आप्पा शिंदे, नानासाहेब हरिश्चंद्र पाटील, डॉ. स्मिताताई शाहापूरकर, पांडुरंग तात्या कुंभार, मलंग शेख, राजाभाऊ शेरखाने, विजय मुद्दे, आप्पासाहेब पाटील, माधव अण्णा कुतवळ, रणजित दादा पाटील, दादासाहेब खरसडे, ॲड. गाजरे, उस्मान कुरेशी आणि सत्तार अहमद शेख यांचा समावेश करण्यात आला आहे.
नव्या पदाधिकाऱ्यांवर पक्ष संघटन अधिक बळकट करणे, जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे आणि काँग्रेसची धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नव्या नियुक्त्यांमुळे धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसचे संघटनात्मक काम अधिक गतिमान होईल, असा विश्वास पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.




