• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, November 15, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

डॉ. आंबेडकर साखर कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

admin by admin
January 28, 2025
in मुख्य बातमी
Reading Time: 1 min read
डॉ. आंबेडकर साखर कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
0
SHARES
607
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे शिंदेवाडी, विठ्ठलवाडीसह नदीकाठावरील गावांमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या दहा वर्षांपासून जिल्हा प्रशासनाकडे या समस्येवर कारवाईची मागणी करण्यात येत असली तरी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कारखान्यात ऊस गाळपासाठी वापरण्यात येणारे केमिकलयुक्त पाणी शिंदेवाडी येथील ओढ्यात सोडले जाते. हा ओढा खापरवाडा नदीला मिळतो आणि तेच पाणी शिंदेवाडी, विठ्ठलवाडीसह परिसरातील गावांमधील विहिरी आणि बोअरवेल्समध्ये मिसळते. त्यामुळे नागरिकांना हेच दूषित पाणी प्यावे लागत आहे. हे पाणी विठ्ठलवाडी, बेंबळी मार्गे माकणी येथील निम्न तेरणा धरणातही जाते.

विठ्ठलवाडीला पाणीपुरवठा करण्यासाठी खापरवाडा नदीपात्रात बोअरवेल आणि विहीर खोदण्यात आली असून, ४० लाख रुपये खर्च करून पाईपलाईन आणि पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. मात्र, नदीचे पाणी दूषित असल्याने ते पिण्यायोग्य नाही. त्यामुळे हा प्रकल्प निरुपयोगी ठरला आहे. याच नदीपात्रात जलयुक्त शिवार अंतर्गत ६-७ रिचार्ज शाफ्टही बांधण्यात आले आहेत, ज्यामध्ये हे दूषित पाणी साठवले जात आहे.

दूषित पाणी पिण्याने नागरिकांना त्वचेचे आजार, केस गळणे, पोटाचे विकार अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच, या पाण्याचा वापर शेतीसाठी केल्याने पिकांचेही नुकसान होत आहे.

नागरिकांनी या समस्येबाबत साखर आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. माजी सरपंच श्रीहरी शिवलकर, माजी ग्रामपंचायत सदस्य रामहरी कस्पटे, परमेश्वर शिवलकर आणि शरद लांडगे यांनी कारखाना प्रशासनाला दूषित पाणी सोडणे बंद करून त्यावर प्रक्रिया करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

Previous Post

परंडा तालुक्यात बस अपघात, एक ठार, अनेक जखमी

Next Post

धाराशिव । मराठा आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःला कोंडून घेतले

Next Post
धाराशिव । मराठा आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःला कोंडून घेतले

धाराशिव । मराठा आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःला कोंडून घेतले

ताज्या बातम्या

भोपे पुजारी मंडळाच्या मागणीस यश; श्री तुळजाभवानी मंदिराचा गाभारा मूळ स्वरूपातच राहणार!

भोपे पुजारी मंडळाच्या मागणीस यश; श्री तुळजाभवानी मंदिराचा गाभारा मूळ स्वरूपातच राहणार!

November 15, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; नळदुर्गात ११.५ लाखांची घरफोडी, तर भूम येथे जागेच्या वादातून साहित्याची चोरी

November 15, 2025
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी

भूम: ऊसतोड मजुराचे लक्ष्मी नगरातून अपहरण; कर्नाटकातील साखर कारखान्यात नेऊन २३ दिवस डांबले!

November 15, 2025
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

उमरगा: ५ लाख परत घ्या, पण जमीन परत द्या! शेतकऱ्याची गयावया व्यर्थ; नैराश्यातून वृद्धाने संपवले जीवन

November 15, 2025
‘खरेपणा’ आणि राणा पाटलांचा संबंध नाही; बिहारशी तुलना करून जनतेचा अपमान करू नका

‘आधी भुयारी गटार योजना गरजेची नव्हती हे राणा पाटलांनी सांगावे’; तानाजी जाधवर यांचे फेसबुक पोस्टवरून थेट आव्हान

November 15, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group