बेंबळी – उमरेगव्हाण येथे शेती व ट्रॅक्टरच्या वाटणीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत, नाना गोविंद कुर्ले, गीता नाना कुर्ले, पुरुषोत्तम पाटील, सरुबाई पुरुषोत्तम पाटील, पांडुरंग पुरुषोत्तम पाटील, रत्नाबाई विकास कुर्ले यांनी अनिल गोविंद कुर्ले (वय ६०) यांना शेती व ट्रॅक्टरची वाटणी करून देण्याच्या कारणावरून मारहाण केली. आरोपींनी अनिल कुर्ले यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, कुर्हाड, काठी, दगड व बतेने मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अनिल कुर्ले यांच्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंवि कलम ११८(१), ३५१(२)(३), ३५२, १८९(२), १९१(२), १९१(३), १९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत, अनिल गोविंद कुर्ले, काशीबाई अनिल कुर्ले, बापू अनिल कुर्ले, अर्चना बापू कुर्ले यांनी नाना अनिल कुर्ले (वय ३१) यांना शेती व ट्रॅक्टरची वाटणी करून देण्याच्या कारणावरून मारहाण केली. आरोपींनी नाना कुर्ले यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, काठी व दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नाना कुर्ले यांच्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंवि कलम ११८(१), ३५१(२)(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू केला आहे.