• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शेतकऱ्यांची दिवाळी मुख्यमंत्र्यांच्या दारी !

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

admin by admin
October 27, 2023
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
शेतकऱ्यांची दिवाळी मुख्यमंत्र्यांच्या दारी !
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांप्रमाणे योग्य भाव मिळावा तसेच दुध दरवाढ, सोयाबीन व इतर शेतीमालाला हमीभावासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सतत पाठपुरावा करीत असताना राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणून यावर्षीची दिवाळी मुख्यमंत्र्यांच्या दारात आंदोलन करून साजरी करणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि.27) देण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, खरीप हंगामात सोयाबीन पेरणी, खते, मशागत आणि काढणीचा खर्च लक्षात घेता त्या तुलनेत सोयाबीनला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपुऱ्या पावसामुळे रब्बी हंगामही धोक्यात आला असून पशुधन जगविण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून यावर्षीची दिवाळी मुख्यमंत्र्यांच्या दारात साजरी करण्याचा शेतकऱ्यांनी निर्णय घेतला आहे.

तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांप्रमाणे योग्य भाव मिळावा. दुधाला प्रतिलिटर 45 रूपये वाढ मिळावी. शासनाकडून मंजूर झालेले अनुदान व पीकविमा तात्काळ शंभर टक्के शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावा. शेतकर्‍यांच्या मुलीला लग्नासाठी प्रत्येकी 10 लाख रूपये मदत द्यावी, डीपी व दुरूस्तीसाठी वीज मंडळाला शेतकर्‍यांना खर्च करावा लागत आहे. तो खर्च शासनाकडून करण्यात यावा, कृषी विभागांतर्गत पोक्रा योजना धाराशिव जिल्ह्यासाठी चालू करण्यात यावी, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून शेतीमालाला हमीभाव तसेच शेतकर्‍यांना मोफत वीज द्यावी, शेतकर्‍यांना देण्यात येणारे पीककर्ज अनुदान तात्काळ मंजूर करून पीककर्जासाठी अडवणूक करणार्‍या बँक अधिकारी व कर्मचार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी, पशुधन जगविण्यासाठी जनावरांना छावणीला नको तर दावणीला चारा उपलब्ध करून घ्यावा. सदरील मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आणि होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भीमाशंकर इंगळे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, विजय सिरसट, उत्तरेश्वर आवाड, राहुल गायकवाड, सुधाकर चोपदार आदींची स्वाक्षरी आहे.

Previous Post

लैंगिक अत्याचार प्रकरणी एका आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी

Next Post

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीच्या चार घटना

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीच्या चार घटना

ताज्या बातम्या

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

संपादकीय | अश्विनी पौळ प्रकरण : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारी महिला संसाराच्या आखाड्यात का हरली?

September 5, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग : अश्विनी पौळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

September 5, 2026
विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

September 4, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!

September 4, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

September 4, 2026

Recent Posts

  • संपादकीय | अश्विनी पौळ प्रकरण : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारी महिला संसाराच्या आखाड्यात का हरली?
  • नळदुर्ग : अश्विनी पौळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?
  • ‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!
  • नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!