• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, July 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये जलसंधारण योजनेत कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप

माहिती अधिकार कार्यकर्त्याचा आमरण उपोषणाचा इशारा

admin by admin
May 27, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये जलसंधारण योजनेत कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप
0
SHARES
1.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत, माहिती अधिकार कार्यकर्ते भास्कर महादेव वारे यांनी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. १७ मे २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

वारे यांच्या आरोपानुसार, मागील तीन वर्षांपासून (२०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५) सुरु असलेल्या या योजनेत जिल्हा जलसंधारण अधिकारी व गुत्तेदार यांनी संगनमत करून कामे न करताच निधी उचलून शासनाची फसवणूक केली आहे. तलावातील गाळ काढून पाणीसाठा वाढवणे आणि तो गाळ शेतकऱ्यांना देऊन जमिनीची सुपीकता वाढवणे हा या योजनेचा उद्देश होता. मात्र, प्रत्यक्षात जी.पी.आर. सिस्टीमचे (जिओटॅगिंग) बनावट व चुकीचे फोटो सादर करणे, तसेच बनावट मोजमाप पुस्तिका तयार करून कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे वारे यांचे म्हणणे आहे.

यापूर्वीही या कामांसंदर्भात शासनस्तरावरून समिती नेमण्यात आली होती, परंतु त्या समितीने प्रत्यक्ष पाहणी न करता जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांशी संगनमत करून शासनाला चुकीचा अहवाल सादर केल्याचा आरोपही वारे यांनी केला आहे. भूम तालुक्यातील काही नागरिकांनी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. वारे यांनी २८ मार्च २०२५ रोजी माहिती अधिकारात या कामांची माहिती मागितली असता, ती त्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी प्रथम अपिलीय अधिकारी, धाराशिव यांच्याकडे अपील दाखल केले असून, सदर अधिकारी सुनावणी घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

जिल्हा जलसंधारण अधिकारी महामुनी यांचे राजकीय लागेबांधे असून ते गुंड प्रवृत्तीचे असल्याचेही वारे यांनी निवेदनात म्हटले आहे. या तक्रारीमुळे आपल्या व आपल्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्र. का. महामुनी यांची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून सखोल चौकशी करण्याची मागणी वारे यांनी केली आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांनाही योग्य कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे.

 

Previous Post

कळंब तालुक्यात ‘मिसिंग’चा ट्रेंड की प्रेमाचा पॅटर्न?

Next Post

धाराशिवमध्ये मे महिन्यातच पावसाचा धमाका: २५ वर्षांचा विक्रम मोडीत, निसर्गाचा ‘हट के’ मूड!

Next Post
धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर; घरे जमीनदोस्त, संसार उघड्यावर, शेतकऱ्याचे नुकसान

धाराशिवमध्ये मे महिन्यातच पावसाचा धमाका: २५ वर्षांचा विक्रम मोडीत, निसर्गाचा 'हट के' मूड!

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरीच्या घटना; दागिने, रोकड व दोन कालवडी लंपास

July 16, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर पंचायत समितीत हायव्होल्टेज ड्रामा! थेट बीडीओंच्या दालनात पेट्रोल फेकले

July 16, 2026
स्मार्ट मीटर व लोडशेडिंगविरोधात शिवसेनेचे महावितरण कार्यालयावर चक्काजाम आंदोलन

स्मार्ट मीटर व लोडशेडिंगविरोधात शिवसेनेचे महावितरण कार्यालयावर चक्काजाम आंदोलन

July 16, 2026
निसर्गाच्या सानिध्यात विठूनामाचा गजर… हरित वारीची नवी पाऊलवाट

निसर्गाच्या सानिध्यात विठूनामाचा गजर… हरित वारीची नवी पाऊलवाट

July 16, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

येडशी येथील दगडू देशमुख खून प्रकरणाचा २४ तासांत छडा!

July 15, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group