• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या विम्याचा प्रश्न ऐरणीवर, केंद्र सरकारच्या परिपत्रक रद्दसाठी राजेनिंबाळकरांचा पुढाकार

admin by admin
March 27, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
शेतकऱ्यांच्या विम्याचा प्रश्न ऐरणीवर, केंद्र सरकारच्या परिपत्रक रद्दसाठी राजेनिंबाळकरांचा पुढाकार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव :  जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा पिक विमा 30 एप्रिल 2024 रोजी जारी करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी परिपत्रकामुळे अद्यापही मिळालेला नाही. या परिपत्रकामुळे प्रती हेक्टरी केवळ 6 हजार रुपये विमा मंजूर करण्यात आला आहे, जे प्रत्यक्षात प्रती हेक्टरी 24 हजार रुपये मिळणे अपेक्षित होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे.

खा. ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर यांनी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा समजून घेत, हा मुद्दा तातडीने केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासमोर तीन वेळा मांडला आहे. 1 जुलै 2024, 22 जुलै 2024 आणि 11 फेब्रुवारी 2025 रोजी लोकसभा सत्रातही त्यांनी हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 2023 मध्ये विमा हप्ता भरला होता. मात्र, अल्प पर्जन्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर, एचडीएफसी विमा कंपनीने 25% आगाऊ नुकसानभरपाई म्हणून 254 कोटी रुपये वाटप केले. परंतु, 30 एप्रिल 2024 रोजी केंद्र सरकारने पिक विमा परिपत्रक काढून फक्त 257 कोटी रुपयांचा विमा मंजूर केला.

2023 आणि 2024 या दोन्ही वर्षांत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे एकूण 1650 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तरीदेखील केंद्र सरकारने परिपत्रक रद्द करण्यासंबंधी कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.

खासदारांचा एकजुटीचा प्रयत्न
शेतकऱ्यांचा हा प्रश्न गंभीर असल्याने खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या पुढाकाराने खा. प्रणिती शिंदे, डॉ. शिवाजी काळगे, बळवंत वानखेडे, शोभा बच्छाव, कल्याण काळे यांच्यासह अन्य खासदारांनी देखील कृषी मंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तात्काळ परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली आहे.

केंद्र सरकारने त्वरित निर्णय घेऊन शेतकऱ्यांना योग्य विमा रक्कम द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या परिस्थितीत त्वरित तोडगा काढून शेतकऱ्यांना त्यांचा वैध विमा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post

कळंब : मोटरसायकलची डिक्की फोडून 50 हजार रुपये आणि चेकबुक लंपास

Next Post

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरण : तुळजापूरच्या तरुणांना आता पोरी मिळणार नाहीत!

Next Post
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरण : तुळजापूरच्या तरुणांना आता पोरी मिळणार नाहीत!

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरण : तुळजापूरच्या तरुणांना आता पोरी मिळणार नाहीत!

ताज्या बातम्या

बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

September 10, 2026
‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

September 10, 2026
“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026

Recent Posts

  • बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?
  • स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
  • ‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!
  • “दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”
  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!