• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

एक रुपयात पिक विमा योजना बंद होणार

 शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी, सरकारवर निवडणुकीच्या जुमल्याचा आरोप

admin by admin
March 30, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
एक रुपयात पिक विमा योजना बंद होणार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

मुंबई: राज्य शासनाने एक रुपयात पिक विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला असून, 2025 च्या खरीप हंगामापासून नवीन सुधारित योजना लागू केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 20 मार्च रोजी झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली. त्यानंतर 26 मार्च रोजी कृषी विभागाने कृषी आयुक्तांना यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत.

महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विम्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता ही योजना गुंडाळण्यात आल्याने हे आश्वासन केवळ जुमलाच ठरल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याआधी ‘लाडकी बहीण’ योजनेसारखी अनेक वचने अपूर्ण राहिल्याची आठवण करून देत शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. CSC केंद्र चालकांकडून बनावट अर्ज दाखल करण्यात आले, शेतकऱ्यांनी चुकीची पीक माहिती दिली आणि शासकीय व अकृषिक जमिनीवरही विमा घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले. विमा कंपन्यांना प्रत्येक अर्जावर 40 रुपये मिळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपात्र अर्ज दाखल झाल्याचा आरोप आहे.

2016 ते 2024 या कालावधीत सरकारने विमा कंपन्यांना 43,201 कोटी रुपये दिले, पण शेतकऱ्यांना केवळ 32,658 कोटींची भरपाई मिळाली. त्यामुळे विमा कंपन्यांनी तब्बल 10,543 कोटींचा नफा कमावल्याचे स्पष्ट झाले आहे.

अन्य राज्यांच्या मॉडेलचा विचार करत महाराष्ट्र सरकारने नवीन धोरण आखले असून, खरीप, रब्बी आणि नगदी पिकांसाठी अनुक्रमे 2%, 1.5% आणि 5% हप्ता आकारण्यात येणार आहे. नवीन योजनेंतर्गत कापणी प्रयोगांवर आधारित विमा रक्कम ठरवण्यात येईल आणि माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने 50% उत्पादनाचा अंदाज घेतला जाईल. ही योजना राज्यस्तरीय ट्रस्टच्या माध्यमातून राबवली जाणार आहे.

पिक विमा अभ्यासक अनिल जगताप यांनी सरकारच्या निर्णयावर टीका करत, “गैरव्यवहार थांबवण्याचे उपाय करा, पण योजना बंद करू नका,” असे मत व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने लवकरात लवकर अंतिम निर्णय घेऊन स्पष्टता द्यावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.

Previous Post

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या एका वाक्यात विषय संपवला…

Next Post

खरीप २०२४ : पुढील आठवड्यात ५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा जमा होणार

Next Post
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा: खरीप २०२४ पीक विमा हप्ता लवकरच खात्यावर

खरीप २०२४ : पुढील आठवड्यात ५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा जमा होणार

ताज्या बातम्या

‘एसआयटी’ नको; एमपीएससी गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा

‘एसआयटी’ नको; एमपीएससी गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा

September 11, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

‘देवाभाऊंनी आदेश दिले’, पण जीआर कुठेय? राणा पाटलांची फेसबुक पोस्ट म्हणजे निव्वळ हवेतील गोळीबार; आदेश दाखवण्याचं खुलं आव्हान!

September 11, 2026
बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

September 10, 2026
‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

September 10, 2026

Recent Posts

  • ‘एसआयटी’ नको; एमपीएससी गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा
  • ‘देवाभाऊंनी आदेश दिले’, पण जीआर कुठेय? राणा पाटलांची फेसबुक पोस्ट म्हणजे निव्वळ हवेतील गोळीबार; आदेश दाखवण्याचं खुलं आव्हान!
  • बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?
  • स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
  • ‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!