धाराशिव – सार्वजनिक रस्त्यांवर वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा व धोका निर्माण करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध धाराशिव जिल्हा पोलिसांनी धडक मोहीम राबवली आहे. धाराशिव शहर, बेंबळी, परंडा, ढोकी, लोहारा आणि येरमाळा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सार्वजनिक रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त उभी करणाऱ्या तब्बल १२ वाहनचालकांविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस ठाणेनिहाय करण्यात आलेली कारवाई:
-
धाराशिव शहर पोलीस ठाणे (४ गुन्हे):
आरपी कॉलेजसमोर, बार्शी नाका आणि नूतन शाळेसमोर रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मच्छिंद्र गोरख कोतवाल (छोटा हत्ती – MH 25 AB 5660), संभाजी शिवाजी इंगळे (पिकअप – MH 13 AM 2590), रामराजे झुंबर शिंदे (पिकअप – MH 47 AS 1903) आणि मनिषकुमार मदनलालजी सोमानी (अल्टो कार – MH 45 N 6789) या चौघांवर ४ स्वतंत्र गुन्हे दाखल झाले.
-
बेंबळी पोलीस ठाणे (२ गुन्हे):
रुईभर पाटीवर रस्त्यावर धोकादायकरीत्या टाटा मॅजिक वाहने उभी केल्याप्रकरणी नंदकुमार सौदागर भनगे (MH 25 R 2976) व शाहजी रामभाऊ जावळे (MH 13 AC 7805, दोघे रा. रुईभर) यांच्यावर २ गुन्हे नोंदवले.
-
परंडा पोलीस ठाणे (२ गुन्हे):
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील शिवनेरी हॉटेलसमोर रस्त्यावर वाहने लावून अडथळा केल्याप्रकरणी उमेश बारीकराव गवारे (बोलेरो – MH 25 R 3177, रा. बावची) आणि रामा शिवाजी कारकर (रिक्षा – MH 09 CW 0708, रा. परंडा) यांच्यावर २ गुन्हे दाखल.
-
ढोकी पोलीस ठाणे (२ गुन्हे):
कसबे तडवळा बसस्थानक परिसरात रहदारीस धोकादायक वाहने उभी केल्याप्रकरणी सतीश राजेंद्र निकाळजे (टाटा एक्सो – MH 25 BK 0290) आणि संजय पोपट पवार (टाटा वाहन – MH 25 AJ 8524, दोघे रा. कसबे तडवळा) यांच्यावर २ गुन्हे नोंदवले.
-
लोहारा पोलीस ठाणे (१ गुन्हा):
लोहारा बसस्थानक परिसरात रस्त्यावर रिक्षा उभी केल्याप्रकरणी नागनाथ सिद्रमा हिंगमिरे (रिक्षा – MH 12 RP 0379, रा. कास्ती खु.) याच्यावर गुन्हा नोंदवला.
-
येरमाळा पोलीस ठाणे (१ गुन्हा):
येरमाळा ग्रामपंचायत समोर धोकादायकरीत्या रिक्षा उभी केल्याप्रकरणी जुनेद मंजूर शेख (रिक्षा – MH 13 CT 9856, रा. मंगळवार पेठ, बार्शी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
BNS कलम २८५ अन्वये कारवाई
सार्वजनिक मार्गावर मानवी जीवितास धोका अथवा अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने पार्क केल्यामुळे पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्यादी होऊन संबंधित १२ चालकांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८५ अन्वये गुन्हे नोंदवले आहेत. सार्वजनिक रस्त्यांवर नियमांचे उल्लंघन करून वाहने उभी करणाऱ्यांवर अशीच कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.



