• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

विमा कंपन्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; पीक विम्याच्या १२ हजार रद्द अर्जांची होणार फेरछाननी

विमा कंपनीवर कारवाईचा इशारा; शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

admin by admin
December 26, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जनता दरबार’ सुरू, नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधता येणार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: प्रधानमंत्री पीक विमा योजना, खरीप हंगाम २०२५ अंतर्गत विमा कंपन्यांनी रद्द केलेल्या अर्जांची आता पुन्हा कसून चौकशी होणार आहे. विमा कंपन्यांनी तांत्रिक कारणास्तव रद्द केलेल्या सुमारे १२ हजार ३५३ अर्जांची फेरछाननी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिले आहेत. चुकीच्या पद्धतीने अर्ज नाकारल्याचे सिद्ध झाल्यास विमा कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा सक्त इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

नुकतीच जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा समिती व जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत खरीप हंगाम २०२५ च्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी विमा अर्ज स्वीकृती, पात्रता आणि प्रामुख्याने विमा कंपन्यांनी घेतलेले आक्षेप यावर गंभीर चर्चा झाली.

चुकीच्या आक्षेपांमुळे शेतकरी अडचणीत

माहे जून ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विमा कंपनीने एकूण १२ हजार ३५३ शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज रद्द केले आहेत. बैठकीत निदर्शनास आले की, यातील अनेक प्रकरणांमध्ये कंपनीने घेतलेले आक्षेप हे तांत्रिक व तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचे आहेत. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकास्तरीय समितीला येत्या सात दिवसांत या सर्व अर्जांची सखोल छाननी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

‘आपले सरकार’ केंद्रांना तातडीचे निर्देश

अनेक शेतकऱ्यांचे अर्ज त्रुटींमुळे ‘रिव्हर्ट’ (परत) आले आहेत. केवळ तांत्रिक कारणांमुळे शेतकरी विम्यापासून वंचित राहू नयेत, यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालकांनी हे अर्ज तात्काळ तपासून आणि त्रुटींची पूर्तता करून विहित मुदतीत पुन्हा सादर करावेत, असे आदेशही जिल्हाधिकारी पूजार यांनी दिले आहेत.

ठळक मुद्दे:

  • खरीप हंगाम २०२५ मधील १२,३५३ रद्द अर्जांची होणार फेरतपासणी.

  • तालुकास्तरीय समितीला ७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे बंधन.

  • विमा कंपनीने अन्यायकारक अर्ज बाद केल्याचे आढळल्यास होणार कायदेशीर कारवाई.

  • त्रुटी असलेल्या अर्जांची दुरुस्ती करून शेतकऱ्यांना पुन्हा संधी मिळणार.

 

Previous Post

नळदुर्गच्या श्री खंडोबा देवाची यात्रा २ जानेवारीपासून; ५ ते ७ लाख भाविकांच्या उपस्थितीत निनादणार ‘येळकोट’चा जयघोष

Next Post

न्यायालयीन खटला मागे घेण्यावरून वृद्धासह पत्नीला कोयत्याने मारहाण; परंडा पोलिसांत ६ जणांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

न्यायालयीन खटला मागे घेण्यावरून वृद्धासह पत्नीला कोयत्याने मारहाण; परंडा पोलिसांत ६ जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

 ‘भावी खासदारां’चा पालकमंत्र्यांसोबत ‘फोटो’ बॉम्ब; ओमराजेंना डिवचण्याचा डाव की ‘निधी’ची तडजोड?

 ‘भावी खासदारां’चा पालकमंत्र्यांसोबत ‘फोटो’ बॉम्ब; ओमराजेंना डिवचण्याचा डाव की ‘निधी’ची तडजोड?

September 2, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

येरमाळा : येडेश्वरी मंदिर परिसरात खेट्याच्या दोऱ्यावेळी गर्दीचा फायदा घेत १.४० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

September 2, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

पारगावमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी; शेतीचा बांध आणि लग्न मोडल्याच्या संशयावरून कोयता, दगडांनी हल्ला

September 2, 2026
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

पावसाच्या खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान; तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या

September 2, 2026
धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

तुळजापूर येथील बहुचर्चित निघृण खून खटल्याचा निकाल: सबळ पुराव्याअभावी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता

September 1, 2026

Recent Posts

  •  ‘भावी खासदारां’चा पालकमंत्र्यांसोबत ‘फोटो’ बॉम्ब; ओमराजेंना डिवचण्याचा डाव की ‘निधी’ची तडजोड?
  • येरमाळा : येडेश्वरी मंदिर परिसरात खेट्याच्या दोऱ्यावेळी गर्दीचा फायदा घेत १.४० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
  • पारगावमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी; शेतीचा बांध आणि लग्न मोडल्याच्या संशयावरून कोयता, दगडांनी हल्ला
  • पावसाच्या खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान; तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या
  • तुळजापूर येथील बहुचर्चित निघृण खून खटल्याचा निकाल: सबळ पुराव्याअभावी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!