तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत, आता केवळ भक्तांचं नव्हे, तर ड्रग्ज नेटवर्कचंही ‘दर्शन’ होत आहे.
कधीकाळी फक्त भक्तांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजापुरात आज भेसूर गुन्हेगारीचे सावट पसरले आहे.
आणि या सावलीत सुरू आहे एक नाट्य — केस चालू आहे का, की केस दाबली जातेय?
📜 १०,००० पानी दोषारोपपत्र – पण परिणाम झिरो?
केसची सुरुवात झाली १४ फेब्रुवारीला.
पोलिसांनी मोठा गाजावाजा करत १४ आरोपींना अटक केली.
३६ आरोपींवर गुन्हा दाखल.
१० हजार पानी दोषारोपपत्र सादर.
CDR, पंचनामे, बॅंक डिटेल्स… सगळं काही आहे.
पण गेल्या महिन्याभरात २२ पैकी एकही आरोपी अटक नाही.
बोरूबहाद्दर विचारतो — पोलीस काम करतायत, की बघ्यांची भूमिका घेतलीये?
🕵️ मुख्य सूत्रधार अजूनही फरार – का फरार ठेवलं जातंय?
“मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे…” हे पोलिसांचं नेहमीचं वाक्य आहे.
पण हा शोध , शोध आहे की ‘शोडषोपचार’ आहे?
एका बाजूला आरोपी फरार, दुसऱ्या बाजूला त्यांच्या जवळच्या मंडळींच्या राजकीय ओळखी.
मग खरंच कारवाई होईल का, की फोनवरून “थोडं थांबा” अशा सूचना चालू आहेत?
🎭 ड्रग्ज, राजकारण आणि मीडिया – एक ‘त्रिकोणीय प्रेमकथा’?
केस सुरू झाली तेव्हा अनेक माईक, बूम, आणि स्टुडिओ प्रचंड तापले होते.
“तुळजापूर उडता पंजाब होणार का?” असा सवाल गाजत होता.
आता मात्र तेच चॅनेल्स मौन व्रत घेतलंय.
बोरूबहाद्दर सांगतो — ज्यावेळी मीडिया शांत होतो, तेव्हा मागे काहीतरी मोठं सुरू असतं!
⚖️ न्यायालयाचं दडपण असेल, तरच पोलिसांचं पोट चालतं का?
विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालं, म्हणजे आता प्रक्रिया पुढे जाईल असं वाटत होतं.
पण पोलिसांची झडती, छापे, फरारांची यादी सगळं कुठं थांबलंय?
खरंच पोलिस कसून काम करतायत, की ‘वरून आदेश नाही’ म्हणून ‘वर्क फ्रॉम होम’ चालूये?
🔚 बोरूबहाद्दर सांगतो –
ड्रग्ज प्रकरणं ही केवळ पोलिसांची नाही, ही समाजाची लढाई आहे.
जर आरोपी मोकाट असतील,
मीडिया गप्प बसेल,
राजकीय हात वर येतील,
तर तुळजापुराचं नाव भक्तीपेक्षा ‘भसाड’ म्हणून ओळखलं जाईल.
🎯 एक शेवटचा सवाल –
खरंच केस चालू आहे…?
की केस दाबण्याचा नवा खेळ सुरू झालाय…?
- बोरूबहाद्दर