• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, April 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये पाणी आणि चाऱ्याच्या टंचाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

admin by admin
March 1, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये पाणी आणि चाऱ्याच्या टंचाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची सूचना
0
SHARES
71
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : यावर्षीच्या संभाव्य पाणी आणि चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी यंत्रणांना सतर्क राहून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात २८ फेब्रुवारी रोजी पाणी आणि चारा टंचाईच्या आढावा बैठकीत पुजार बोलत होते.

या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिका अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी, जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले की, गाळ साचलेल्या विहिरींमधील गाळ काढण्याचे काम आणि नादुरुस्त असलेल्या बोअरवेलची दुरुस्ती तातडीने करावी. भूजल पातळी आणि पाणी साठ्यात वाढ करण्यासाठी यंत्रणांनी एकत्र काम करावे. तालुका यंत्रणांनी पाणी टंचाई काळात समन्वय साधून आवश्यक उपाययोजना कराव्यात. यावर्षी वृक्षारोपण मोहीम प्रभावीपणे राबवावी आणि त्यासाठी रोपवाटिका तयार कराव्यात. जल जीवन मिशनची कामे वेळेत आणि दर्जेदार पूर्ण करावीत.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.घोष म्हणाले की, गेल्या वर्षी ज्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात होता, त्या गावांवर आतापासूनच लक्ष ठेवावे. नादुरुस्त हातपंप दुरुस्त करावेत, गाळ साचलेल्या विहिरींमधील गाळ काढावा. तसेच टँकरने पाणीपुरवठा करताना टँकरची क्षमता आणि वेळेत पोहोचण्याची दक्षता घ्यावी.

जिल्ह्यात २०२४ मध्ये सरासरी १२० टक्के पाऊस झाला. सीना कोळेगाव प्रकल्पात ५७ टक्के, १७ मध्यम प्रकल्पात ५२ टक्के आणि २०८ लघु प्रकल्पात ४० टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी १०३ गावांना १५३ टँकरने पाणीपुरवठा केला गेला, तर ५०० गावांमध्ये ८५४ विहिरी व बोअरवेल नागरिकांसाठी अधिग्रहित करण्यात आले, अशी माहिती मोहन सरवदे यांनी दिली.

जिल्ह्यात ग्रामीण व नागरी भागात १ एप्रिल ते ३१ जून २०२५ पर्यंत पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून, ९ प्रकारच्या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागासाठी ४८७ गावांसाठी १३४८ उपाययोजना प्रस्तावित आहेत. जिल्ह्यात ७,९०,३९९ पशुधन असून, त्यांना दररोज ३०८९ मेट्रिक टन वैरणाची गरज आहे, असे पशुसंवर्धन अधिकारी डॉ.पुजारी यांनी सांगितले. इतर अधिकाऱ्यांनीही पाणी टंचाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजनांची माहिती दिली.

Previous Post

धाराशिवच्या ‘अपर’चा बदली ड्रामा: नवऱ्याची खुर्ची रिकामी, पत्नीने घेतली जागा!

Next Post

“बेशरम” झाड खुर्चीत, पण वन अधिकारी गायब – टी-२२ अजूनही मोकाट!

Next Post
“बेशरम” झाड खुर्चीत, पण वन अधिकारी गायब – टी-२२ अजूनही मोकाट!

"बेशरम" झाड खुर्चीत, पण वन अधिकारी गायब – टी-२२ अजूनही मोकाट!

ताज्या बातम्या

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

April 22, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

जळकोटमध्ये १ लाख १६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नळदुर्ग पोलिसांची धडक कारवाई

April 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, वाहन चोरीसह पाच घटनांत लाखोंचा ऐवज लंपास

April 21, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

तेर येथील यात्रेत तरुणास बेदम मारहाण; १० जणांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

April 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group